शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नवी मुंबईत लवकरच पामबीचवर होणार फुलपाखरू उद्यान

By नारायण जाधव | Updated: August 20, 2023 18:28 IST

सारसोळेतील 12 एकर भूखंडाचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याची सुचना : मंदा म्हात्रेंची होती मागणी

नवी मुंबई:नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर असून त्याला उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असून या खाडीत जगप्रसिद्ध अशा फ्लेमिंगो व विविध पक्षाचा तसेच फुलपाखरांचा वावर असतो. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे याची भेट घेऊन नवी मुंबई येथील सारसोळेत पामबीच लगत असलेल्या 12 एकर भूखंडावर फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार शिंदे नगरविकास सचिवाना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

म्हात्रे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) ची संकल्पना हळूहळू भारतात रुजायला लागली आहे. फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) नेमका काय आहे ? तो कसा उभारतात ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. भारतात अनेक ठिकाणी तसेच वैयक्तिक असे फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) उभारले गेले आहेत. जसे सिंगापूरच्या धर्तीवर नवी मुंबईत बटरफ्लाय गार्डन बनविल्यास ते एक सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास येईल. तसेच उद्यानातील विविध प्रकारचे रंगबेरंगी फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय गार्डन) पाहण्यसाठी पर्यटकांची संख्याही वाढेल.

या फुलपाखरू उद्यानामुळे नवी मुंबईचा दर्जा ही वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होईल व नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात भर पडून पर्यटनाला चालनाही मिळेल. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत तपासणी करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. नवी मुंबई शहर आधीच फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखले जाते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई