शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

१५ व्या वित्त आयोगाचे राज्याच्या २१ शहरांना ७९९ कोटी

By नारायण जाधव | Updated: October 31, 2022 18:26 IST

राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे.

नवी मुंबई :

राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे. यात मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांच्या वाट्याला ५२३ कोटी आले असून एकट्या मुंबई महापालिकेस ३२२ कोटी रुपये मिळाले आहेत.

ठाण्यास ५० कोटी तर नवी मुंबईला ३२ कोटीनगरविकास विभागाने २५ ऑक्टोबर रोजी २१ शहरांना जे ७९९ कोटी रुपये वितरीत केले आहेत, त्यात मुंबई महापालिकेला ३२२ कोटी १९ लाख ८६ हजार ५७२ रुपये, नवी मुंबई महापालिकेस ३२ कोटी १७ लाख ३० हजार ७२८ रुपये, ठाणे महापालिकेस ४९ कोटी ९० लाख ८१ हजार १५१ रुपये, कल्याण-डोंबिवली महापालिकेस ३५ कोटी ६० लाख ६६ हजार ७४६ रुपये, मीरा-भाईंदर महापालिकेस २३ कोटी ४१ लाख ३९ हजार २७६ रुपये, उल्हासनगरला १२ कोटी ८० लाख एक हजार २२७ रुपये, अंबरनाथ नगरपालिका सात कोटी ८५ लाख ४५ हजार ५२० रुपये, बदलापूर नगरपालिकेस पाच कोटी ९४ लाख ४८ हजार ७८० तर वसई-विरार महापालिकेस ३३ कोटी रुपये दिले आहेत.

स्वच्छ भारतची रँकिंग वाढणारया निधीतून या शहरांना आपापल्या हद्दीतील पाणीटंचाई असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा योजना राबविता येणार आहेत. यामुळे अनेक शहरांतील पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर होऊन मुबलक पाणी मिळून तेथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाचा घटक असलेल्या घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून क्षेपणभूमी, कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, घनकचऱ्यापासून विटा बनविणे यासारखे प्रकल्प राबविता येणार आहेत. यातून या शहरांतील रस्तोरस्ती दिसणारे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी दूर होऊनदेशातील स्वच्छ भारत अभियानातील त्यांची रँकिंग वाढण्यासही मदत होणार आहे.