शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

अ‍ॅण्टिजन यादीत 7872 नावे बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:17 IST

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अ‍ॅण्टिजन चाचण्यांच्या यादीत ७८७२ नावे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचणी न करताच ही नावे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कोरोना चाचण्यासंदर्भातील तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही चूक झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. 

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. आयसीएमआरच्या संकेतस्थळावर अ‍ॅण्टिजन चाचण्या न करताच अनेकांची नावे प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आयुक्त बांगर यांनी तीन सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीने गुरुवारी ११,५९१ पानांचा अहवाल आयुक्त बांगर यांना सादर केला आहे.

या अहवालात ७८७२ नावे कोणतीही चाचणी न करताच आयसीएमआरच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारची आर्थिक नियमितता आढळून आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव व निष्काळजीपणा या प्रकाराला कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  या समितीने महापालिकेने खरेदी केलेल्या अ‍ॅण्टिजन टेस्ट किट्स व प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या किट्स यांची तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे. 

तसेच ज्या अ‍ॅण्टिजन टेस्ट करून घेतलेल्या एक लाख ५१ हजार ९५६ नागरिकांना महापालिकेच्या कॉल सेंटरमार्फत संपर्क साधण्यात आला. यापैकी १५९७ नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चाचणी केलेल्या  १८४५ कुटुंबांना समितीने प्रत्यक्ष भेट देऊन चोकशी केली. यापैकी केवळ दोन नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले.  

याशिवाय समितीने संबंधित नोडल अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला.     परंतु नोंदणीच्या सदोष कार्यपद्धतीमुळे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर ७८७२ नावांची अतिरिक्त नोंद झाल्याचे अहवालात  स्पष्ट करण्यात आले आहे.  एकूणच कोरोना चाचणीचे क्षेत्रिय स्तरावर चोख काम झाले असले तरी आयसीएमआर पोर्टलवर चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.   तसेच  ज्या १५९७ व्यक्तींनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले आहे, त्याबाबत पुन्हा शहनिशा करणे आवश्यक असल्याचे समितीने या अहवालत नमूद केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई