शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅण्टिजन यादीत 7872 नावे बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:17 IST

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अ‍ॅण्टिजन चाचण्यांच्या यादीत ७८७२ नावे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचणी न करताच ही नावे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कोरोना चाचण्यासंदर्भातील तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही चूक झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. 

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. आयसीएमआरच्या संकेतस्थळावर अ‍ॅण्टिजन चाचण्या न करताच अनेकांची नावे प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आयुक्त बांगर यांनी तीन सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीने गुरुवारी ११,५९१ पानांचा अहवाल आयुक्त बांगर यांना सादर केला आहे.

या अहवालात ७८७२ नावे कोणतीही चाचणी न करताच आयसीएमआरच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारची आर्थिक नियमितता आढळून आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव व निष्काळजीपणा या प्रकाराला कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  या समितीने महापालिकेने खरेदी केलेल्या अ‍ॅण्टिजन टेस्ट किट्स व प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या किट्स यांची तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे. 

तसेच ज्या अ‍ॅण्टिजन टेस्ट करून घेतलेल्या एक लाख ५१ हजार ९५६ नागरिकांना महापालिकेच्या कॉल सेंटरमार्फत संपर्क साधण्यात आला. यापैकी १५९७ नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चाचणी केलेल्या  १८४५ कुटुंबांना समितीने प्रत्यक्ष भेट देऊन चोकशी केली. यापैकी केवळ दोन नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले.  

याशिवाय समितीने संबंधित नोडल अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला.     परंतु नोंदणीच्या सदोष कार्यपद्धतीमुळे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर ७८७२ नावांची अतिरिक्त नोंद झाल्याचे अहवालात  स्पष्ट करण्यात आले आहे.  एकूणच कोरोना चाचणीचे क्षेत्रिय स्तरावर चोख काम झाले असले तरी आयसीएमआर पोर्टलवर चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.   तसेच  ज्या १५९७ व्यक्तींनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले आहे, त्याबाबत पुन्हा शहनिशा करणे आवश्यक असल्याचे समितीने या अहवालत नमूद केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई