शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
5
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
6
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
7
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
8
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
9
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
10
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
11
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
12
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
13
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
14
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
15
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
16
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
17
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
18
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
19
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
20
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?

अ‍ॅण्टिजन यादीत 7872 नावे बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:17 IST

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या.

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अ‍ॅण्टिजन चाचण्यांच्या यादीत ७८७२ नावे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचणी न करताच ही नावे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कोरोना चाचण्यासंदर्भातील तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही चूक झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. 

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. आयसीएमआरच्या संकेतस्थळावर अ‍ॅण्टिजन चाचण्या न करताच अनेकांची नावे प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आयुक्त बांगर यांनी तीन सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीने गुरुवारी ११,५९१ पानांचा अहवाल आयुक्त बांगर यांना सादर केला आहे.

या अहवालात ७८७२ नावे कोणतीही चाचणी न करताच आयसीएमआरच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारची आर्थिक नियमितता आढळून आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव व निष्काळजीपणा या प्रकाराला कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  या समितीने महापालिकेने खरेदी केलेल्या अ‍ॅण्टिजन टेस्ट किट्स व प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या किट्स यांची तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे. 

तसेच ज्या अ‍ॅण्टिजन टेस्ट करून घेतलेल्या एक लाख ५१ हजार ९५६ नागरिकांना महापालिकेच्या कॉल सेंटरमार्फत संपर्क साधण्यात आला. यापैकी १५९७ नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चाचणी केलेल्या  १८४५ कुटुंबांना समितीने प्रत्यक्ष भेट देऊन चोकशी केली. यापैकी केवळ दोन नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले.  

याशिवाय समितीने संबंधित नोडल अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला.     परंतु नोंदणीच्या सदोष कार्यपद्धतीमुळे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर ७८७२ नावांची अतिरिक्त नोंद झाल्याचे अहवालात  स्पष्ट करण्यात आले आहे.  एकूणच कोरोना चाचणीचे क्षेत्रिय स्तरावर चोख काम झाले असले तरी आयसीएमआर पोर्टलवर चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.   तसेच  ज्या १५९७ व्यक्तींनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले आहे, त्याबाबत पुन्हा शहनिशा करणे आवश्यक असल्याचे समितीने या अहवालत नमूद केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई