शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

नवी मुंबईमध्ये वर्षभरात आगीच्या ६८२ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:05 IST

शहरातील १,७८० ठिकाणी मदतीसाठी धावले अग्निशमनचे जवान

नवी मुंबई : नवी मुंबईमध्येही आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वर्षभरामध्ये तब्बल ६८२ ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. रेस्क्यू आॅपरेशन, अपघातासह एकूण १,७८० ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी धाव घ्यावी लागली होती. अनेक सरकारी अस्थापनांसह निवासी इमारतींमध्येही अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्याचे निदर्शनास आले आहे.नवी मुंबई सुनियोजित व देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांपैकी एक असल्याची प्रसिद्धी केली जाते; परंतु प्रत्यक्षात येथील नागरिकांमध्येही अग्निशमन नियमांविषयी उदासीनता असल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारती, सरकारी कार्यालये व व्यावसायिक आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. आग लागू नये यासाठी काळजी घेतली जात नसल्याचे अनेक दुर्घटनांच्या नंतर स्पष्ट झाले आहे. यामुळे प्रतिदिन १ ते २ ठिकाणी आग लागत आहे. रेस्क्यू आॅपरेशनसाठीही प्रतिदिन किमान एकतरी कॉल येऊ लागला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरामध्ये अग्निशमन दलाच्या पाच कार्यालयांमध्ये एकूण १,७८० कॉल आले आहेत. यामधील ६११ ठिकाणी आग लागली होती. रेस्क्यू आॅपरेशनसाठी ४५९, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे ४९, इतर ६४४ व अपघातांचे १७ कॉल आले आहेत. पाच कार्यालयांमध्ये मिळून प्रतिदिन जवळपास चार कॉल आल्याचे अग्निशमनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.महापालिका क्षेत्रातील दुर्घटनांच्या घटनांमध्ये रस्ते अपघातांपेक्षा आगीच्या घटनांची संख्या वाढत आहे. आग लागलेल्या बहुतांश ठिकाणी आगनियंत्रण यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येते. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांनी त्यांच्याकडील साठ्याची माहिती प्रवेशद्वारावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात रसायन आहे, याचा तपशील या फलकावर नोंद करणे आवश्यक आहे. सर्व कंपन्यांमध्ये आगनियंत्रण यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे; परंतु अनेक कारखानदार याकडे दुर्लक्ष करतात. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत तेथील अग्निशमन यंत्रणा सुरू असते. त्यानंतर त्याची देखभाल केली जात नसल्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.तुर्भेतील डम्पिंगला आगतुर्भेतील पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याची माहिती वाशी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार दुपारी २:३० च्या सुमारास बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली; परंतु आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. अज्ञाताकडून ही आग लावली गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही त्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.नवी मुंबई क्षेत्रातील आतापर्यंतच्या मोठ्या आगीच्या घटना२४ मार्च २०१२ - कोपरखैरणेमधील जुन्या डम्पिंग ग्राउंडला आग, भंगार वाहनांसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक१९ आॅगस्ट २०१३ - सीबीडी सेक्टर ११ मधील अग्रवाल ट्रेड सेंटरच्या सहाव्या मजल्यावर आग१९ एप्रिल २०१४ - वाशीमधील नवी मुंबई मर्चंट चेंबरच्या ए मार्ट शॉप या दुकानामधये भीषण आग३१ आॅक्टोबर २०१५ - सीवूड इस्टेट इमारतीमधील १५ व्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग२४ मे २०१६ - सीबीडी सेक्टर १५ मधील ब्रिव्ह हाउस कॅफेमध्ये आगनोव्हेंबर २००६ - एमआयडीसीमधील सावला कोल्ड स्टोरेजला भीषण आग२०१८ मधील तपशीलजानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये शहरात आगीच्या ६८२ घटना घडल्या होत्या. ४०१ ठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन, २६ ठिकाणी अत्यावश्यक मदत, ५२५ इतर घटना व ३१ अपघात, अशा वर्षभरात १,६६५ वेळा अग्निशमन जवानांना मदतीसाठी धाव घ्यावी लागल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.