शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

By नारायण जाधव | Updated: March 8, 2024 21:22 IST

निधी उभा करण्याचे मोठे आव्हान : नगरविकासकडून कोणतेही आश्वासन नाह.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यावर अखेर नगरविकास विभागाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. एकेकाळी वाढीव मालमत्ताकराच्या प्रश्नांवर नवी मुंबई महापालिकेतून २००५ पासून बाहेर पडल्याने ती गावे आणि त्यांच्या परिक्षेत्राची बजबजपुरी झाली आहे. यामुळे त्यांना नवी मुंबईच्या स्तरावर आणण्यासाठी विकास आराखड्यानुसार किमान पायाभूत पुरविण्यासाठी ६६०० कोटींची गरज भासणार आहे.या गावांसाठी इतका मोठा निधी कसा उभा करायचा याचे मोठे आव्हान आता महापालिका प्रशासनासमाेर असणार आहे. कारण या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करताना नगरविकास विभागाने महापालिकेस कोणतेही आश्वासन दिलेले नाही. निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत. गावांच्या समावेशाचा पूर्व इतिहास- २००१ मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. यामुळे गावांचा विकास रखडल्याने आमचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. यासाठी आंदोलने, निदर्शने केली होती.- अखेर एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना मार्च २०२२ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. स्थानिकांनी पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या सर्व पक्षीय विकास समितीद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.- यानंतर २०१५ मध्ये ती गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत, असा अशासकीय ठराव मंजूर करण्यात आला. अखेर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. तर, मार्च २०२२ च्या अधिवेशनात नगरविकासमंत्र्यांनी त्यांच्या महापालिकेत समावेशाची घोषणा केली...........महापालिकेने या सुविधा निर्माण केल्या१९९२ मध्ये १४ गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला. त्यानंतर महापालिकेनेही या गावांसाठी नळ योजना, रस्ते अशा काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या. यात नावाळीत माता-बाल रुग्णालयही बांधले होते. या भागातून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले होते...........असा हवा निधी- आता महायुती सरकारने गुरुवारी ही १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय काढल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असला तरी या गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या तिजाेरीवर मोठा ताण पडणार आहे.- महापालिकेत ही गावे घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रारूप विकास आराखड्यानुसार तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले होते.- यात एकत्रित क्षेत्रासाठी ६१०० कोटी तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागतील, असे महापालिकेने नगरविकास कळविले हाेते, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लाेकमत’ला दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई