शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

By नारायण जाधव | Updated: March 8, 2024 21:22 IST

निधी उभा करण्याचे मोठे आव्हान : नगरविकासकडून कोणतेही आश्वासन नाह.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यावर अखेर नगरविकास विभागाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. एकेकाळी वाढीव मालमत्ताकराच्या प्रश्नांवर नवी मुंबई महापालिकेतून २००५ पासून बाहेर पडल्याने ती गावे आणि त्यांच्या परिक्षेत्राची बजबजपुरी झाली आहे. यामुळे त्यांना नवी मुंबईच्या स्तरावर आणण्यासाठी विकास आराखड्यानुसार किमान पायाभूत पुरविण्यासाठी ६६०० कोटींची गरज भासणार आहे.या गावांसाठी इतका मोठा निधी कसा उभा करायचा याचे मोठे आव्हान आता महापालिका प्रशासनासमाेर असणार आहे. कारण या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करताना नगरविकास विभागाने महापालिकेस कोणतेही आश्वासन दिलेले नाही. निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत. गावांच्या समावेशाचा पूर्व इतिहास- २००१ मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. यामुळे गावांचा विकास रखडल्याने आमचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. यासाठी आंदोलने, निदर्शने केली होती.- अखेर एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना मार्च २०२२ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. स्थानिकांनी पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या सर्व पक्षीय विकास समितीद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.- यानंतर २०१५ मध्ये ती गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत, असा अशासकीय ठराव मंजूर करण्यात आला. अखेर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. तर, मार्च २०२२ च्या अधिवेशनात नगरविकासमंत्र्यांनी त्यांच्या महापालिकेत समावेशाची घोषणा केली...........महापालिकेने या सुविधा निर्माण केल्या१९९२ मध्ये १४ गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला. त्यानंतर महापालिकेनेही या गावांसाठी नळ योजना, रस्ते अशा काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या. यात नावाळीत माता-बाल रुग्णालयही बांधले होते. या भागातून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले होते...........असा हवा निधी- आता महायुती सरकारने गुरुवारी ही १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय काढल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असला तरी या गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या तिजाेरीवर मोठा ताण पडणार आहे.- महापालिकेत ही गावे घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रारूप विकास आराखड्यानुसार तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले होते.- यात एकत्रित क्षेत्रासाठी ६१०० कोटी तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागतील, असे महापालिकेने नगरविकास कळविले हाेते, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लाेकमत’ला दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई