शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

By नारायण जाधव | Updated: March 8, 2024 21:22 IST

निधी उभा करण्याचे मोठे आव्हान : नगरविकासकडून कोणतेही आश्वासन नाह.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यावर अखेर नगरविकास विभागाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. एकेकाळी वाढीव मालमत्ताकराच्या प्रश्नांवर नवी मुंबई महापालिकेतून २००५ पासून बाहेर पडल्याने ती गावे आणि त्यांच्या परिक्षेत्राची बजबजपुरी झाली आहे. यामुळे त्यांना नवी मुंबईच्या स्तरावर आणण्यासाठी विकास आराखड्यानुसार किमान पायाभूत पुरविण्यासाठी ६६०० कोटींची गरज भासणार आहे.या गावांसाठी इतका मोठा निधी कसा उभा करायचा याचे मोठे आव्हान आता महापालिका प्रशासनासमाेर असणार आहे. कारण या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करताना नगरविकास विभागाने महापालिकेस कोणतेही आश्वासन दिलेले नाही. निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत. गावांच्या समावेशाचा पूर्व इतिहास- २००१ मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. यामुळे गावांचा विकास रखडल्याने आमचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. यासाठी आंदोलने, निदर्शने केली होती.- अखेर एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना मार्च २०२२ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. स्थानिकांनी पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या सर्व पक्षीय विकास समितीद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.- यानंतर २०१५ मध्ये ती गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत, असा अशासकीय ठराव मंजूर करण्यात आला. अखेर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. तर, मार्च २०२२ च्या अधिवेशनात नगरविकासमंत्र्यांनी त्यांच्या महापालिकेत समावेशाची घोषणा केली...........महापालिकेने या सुविधा निर्माण केल्या१९९२ मध्ये १४ गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला. त्यानंतर महापालिकेनेही या गावांसाठी नळ योजना, रस्ते अशा काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या. यात नावाळीत माता-बाल रुग्णालयही बांधले होते. या भागातून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले होते...........असा हवा निधी- आता महायुती सरकारने गुरुवारी ही १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय काढल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असला तरी या गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या तिजाेरीवर मोठा ताण पडणार आहे.- महापालिकेत ही गावे घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रारूप विकास आराखड्यानुसार तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले होते.- यात एकत्रित क्षेत्रासाठी ६१०० कोटी तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागतील, असे महापालिकेने नगरविकास कळविले हाेते, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लाेकमत’ला दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई