शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

६४ देशांना आवडे भारताचा कांदा, वर्षभरात २५ लाख टन निर्यात

By नामदेव मोरे | Updated: June 13, 2023 08:15 IST

४५२२ कोटी रुपयांची उलाढाल

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतामधून कृषी मालाची निर्यात वर्षनिहाय वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये विक्रमी निर्यात झाली आहे. जगभरातून भारतीय फळे, भाजीपाल्याला मागणी वाढत आहेच; पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख २५ हजार टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

कृषिप्रधान देश ही भारताची ओळख जगभर होऊ लागली आहे. भारतामधील फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या वस्तू, अन्नधान्य, दुग्धजन्य वस्तूंना २०४ देशांमधून मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला हा नाशीवंत कृषीमाल असूनही त्यांची निर्यात वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये २४४३ कोटींचा भाजीपाला. ३७८ कोटींचे आंबे, २५४३ कोटींचे द्राक्ष, २७३६ कोटी रुपयांची इतर फळे निर्यात केली आहेत. या सर्व भाजीपाला व फळांपेक्षाही भारतीय कांद्याला विदेशातून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

२०२० - २१ मध्ये १५ लाख ७८ हजार टन कांद्याची निर्यात होऊन २८२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१ - २२ मध्ये १५ लाख ३७ हजार टन कांद्याची निर्यात होऊन ३४३२ टन उलाढाल झाली होती. २०२२ - २३ या आर्थिक वर्षात विक्रमी २५ लाख २५ हजार २५८ टन निर्यात होऊन ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. 

तीन वर्षांत ६२ टक्के वाढ

कांदा निर्यातीमध्ये व उलाढालीमध्ये तीन वर्षांत ६२ टक्के वाढ झाली आहे. यंदा ६४ देशांमध्ये कांदा निर्यात झाला आहे. बांगलादेश, मलेशीया, यूएई, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, व्हिएतनाम, ओमान, कुवेत, सिंगापूर, इराक या देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

टॅग्स :onionकांदा