शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

६४ देशांना आवडे भारताचा कांदा, वर्षभरात २५ लाख टन निर्यात

By नामदेव मोरे | Updated: June 13, 2023 08:15 IST

४५२२ कोटी रुपयांची उलाढाल

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतामधून कृषी मालाची निर्यात वर्षनिहाय वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये विक्रमी निर्यात झाली आहे. जगभरातून भारतीय फळे, भाजीपाल्याला मागणी वाढत आहेच; पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख २५ हजार टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

कृषिप्रधान देश ही भारताची ओळख जगभर होऊ लागली आहे. भारतामधील फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या वस्तू, अन्नधान्य, दुग्धजन्य वस्तूंना २०४ देशांमधून मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला हा नाशीवंत कृषीमाल असूनही त्यांची निर्यात वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये २४४३ कोटींचा भाजीपाला. ३७८ कोटींचे आंबे, २५४३ कोटींचे द्राक्ष, २७३६ कोटी रुपयांची इतर फळे निर्यात केली आहेत. या सर्व भाजीपाला व फळांपेक्षाही भारतीय कांद्याला विदेशातून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

२०२० - २१ मध्ये १५ लाख ७८ हजार टन कांद्याची निर्यात होऊन २८२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१ - २२ मध्ये १५ लाख ३७ हजार टन कांद्याची निर्यात होऊन ३४३२ टन उलाढाल झाली होती. २०२२ - २३ या आर्थिक वर्षात विक्रमी २५ लाख २५ हजार २५८ टन निर्यात होऊन ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. 

तीन वर्षांत ६२ टक्के वाढ

कांदा निर्यातीमध्ये व उलाढालीमध्ये तीन वर्षांत ६२ टक्के वाढ झाली आहे. यंदा ६४ देशांमध्ये कांदा निर्यात झाला आहे. बांगलादेश, मलेशीया, यूएई, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, व्हिएतनाम, ओमान, कुवेत, सिंगापूर, इराक या देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

टॅग्स :onionकांदा