शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

६४ देशांना आवडे भारताचा कांदा, वर्षभरात २५ लाख टन निर्यात

By नामदेव मोरे | Updated: June 13, 2023 08:15 IST

४५२२ कोटी रुपयांची उलाढाल

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतामधून कृषी मालाची निर्यात वर्षनिहाय वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये विक्रमी निर्यात झाली आहे. जगभरातून भारतीय फळे, भाजीपाल्याला मागणी वाढत आहेच; पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख २५ हजार टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

कृषिप्रधान देश ही भारताची ओळख जगभर होऊ लागली आहे. भारतामधील फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या वस्तू, अन्नधान्य, दुग्धजन्य वस्तूंना २०४ देशांमधून मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला हा नाशीवंत कृषीमाल असूनही त्यांची निर्यात वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये २४४३ कोटींचा भाजीपाला. ३७८ कोटींचे आंबे, २५४३ कोटींचे द्राक्ष, २७३६ कोटी रुपयांची इतर फळे निर्यात केली आहेत. या सर्व भाजीपाला व फळांपेक्षाही भारतीय कांद्याला विदेशातून सर्वाधिक पसंती मिळत आहे.

२०२० - २१ मध्ये १५ लाख ७८ हजार टन कांद्याची निर्यात होऊन २८२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१ - २२ मध्ये १५ लाख ३७ हजार टन कांद्याची निर्यात होऊन ३४३२ टन उलाढाल झाली होती. २०२२ - २३ या आर्थिक वर्षात विक्रमी २५ लाख २५ हजार २५८ टन निर्यात होऊन ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. 

तीन वर्षांत ६२ टक्के वाढ

कांदा निर्यातीमध्ये व उलाढालीमध्ये तीन वर्षांत ६२ टक्के वाढ झाली आहे. यंदा ६४ देशांमध्ये कांदा निर्यात झाला आहे. बांगलादेश, मलेशीया, यूएई, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, व्हिएतनाम, ओमान, कुवेत, सिंगापूर, इराक या देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

टॅग्स :onionकांदा