शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कोरोनातही ५४० कोटी मालमत्ता कर जमा, नवी मुंबईत अभय योजनेचा १९,८९१ जणांनी घेतला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 02:51 IST

NMMC News : कोरोनामुळे वर्षभरात शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही पालिका प्रशासन ४५० कोटी मालमत्ता कर संकलित करण्यात यशस्वी झाली आहे.

नवी मुंबई : कोरोनामुळे वर्षभरात शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही पालिका प्रशासन ४५० कोटी मालमत्ता कर संकलित करण्यात यशस्वी झाली आहे. अभय याेजनेचा १९,८९१ जणांनी लाभ घेतला असून त्यांच्याकडून १५९ कोटी जमा झाले आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसात ४६ कोटी ४२ लक्ष रुपये वसूल झाले  आहेत.  नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन वर्षभर दिवसरात्र परिश्रम करत आहे. या कालावधीमध्ये मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी वर्षभर नियमित आढावा घेऊन प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनाही कर वेळेत भरण्याचे आवाहन केले होेते. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान फक्त १४ कोटी रुपये वसूल झाले होते. यामुळे उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होणार की नाही याविषयी शंका उपस्थित होत  होती.  आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून पुढील तीन महिन्यांत जास्तीत जास्त कर वसूल करण्याचे निर्देश दिले. यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल ४०० कोटीपेक्षा जास्त कर वसूल झाला. पालिकेने थकबाकी वसूलीसाठी १५ डिसेंबर ते १५ मार्चदरम्यान  अभय योजना जाहीर केली होती. या दरम्यान दंड रकमेमध्ये ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. १६ मार्च ते ३१ मार्चदरम्यान दंड रकमेमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली  होती.  अभय योजनेमुळे १५९ कोटी कर वसूल झाला असून नागरिकांना ७८ कोटी ८६ लाख ६३ हजार ७५९ रुपये सवलत मिळाली आहे. वर्षअखेरीस तब्बल ४६ कोटी ४२ लाख ७९ हजार १८५ रुपये कर जमा झाला आहे. मालमत्ता करातून ५४० कोटी कर संकलित झाला आहे.  अभय योजना बंदमहानगरपालिकेने कोरोनामुळे नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. ३१ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आली आहे. यापुढे थकबाकीदारांना व्याज व दंडाची सर्व रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर मनपाच्यावतीने कोणालाही करामध्ये सवलत दिली जाणार नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTaxकर