शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नवी मुंबईत ५३५ इमारती धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिट करा : आयुक्तांचे आदेश

By नारायण जाधव | Updated: April 26, 2024 19:29 IST

३० वर्षांपेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजायचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ५३५ इमारती धोकादायक असून, त्यांचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेले बांधकाम किंवा संरचना अभियंत्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे बंधन आयुक्त कैलास शिंदे यांनी घातले आहे. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सालाबादप्रमाणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २५४ पोटकलम (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित केलेल्या, तसेच अधिनियम कलम २६५(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अनिवार्य आहे.

३० वर्षांपेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजायचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारस केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण करून ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे.अन्यथा २५ हजार दंडसंरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था/मालक/भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना २५ हजार रुपये अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ताकराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रकमेचा दंड ठोठावण्याची तरतूद महानगरपालिका अधिनियम कलम ३९८ (अ) मध्ये अंतर्भूत आहे.३० सप्टेंबर २०२४ ची डेडलाइनहे संरचनात्मक परीक्षण दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहायक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सादर करायचा आहे.अपघात झाल्यास तुमची जबाबदारीधोकादायक झालेल्या इमारतींचा/घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ शकते, म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा/घराचा रहिवास/वापर तत्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, याची नोंद घेण्यात यावी, असे नवी मुंबई महानगरपालिकेने सूचित केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई