शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रभाग आरक्षणाविषयी ५२४ हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:45 IST

शुक्रवारी होणार सुनावणी : तीन प्रभागांविषयी सर्वाधिक आक्षेप, सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग आरक्षणावर तब्बल ५२४ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. सर्वाधिक हरकती तीन प्रभागांविषयी घेण्यात आल्या असून, यावर १४ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे.महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक विभागाने १ फेब्रुवारीला प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षणाचा फटका आजी-माजी महापौरांसह अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना बसला आहे. ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये तब्बल ५२४ हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक हरकती २१, २२ व १६ या प्रभागाविषयी आहेत. प्रभाग १६ मध्ये सद्यस्थितीमध्ये विनया मढवी या नगरसेविका आहेत. हा प्रभाग अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित झाला आहे. या प्रभागाच्या आरक्षणाला अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. प्रभाग २१ ओबीसी महिला व २२ सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित असून या दोन प्रभागांविषयीही अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. एकूण हरकतींवर १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त व ठाणे जिल्हा अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. महापालिका मुख्यालयामधील ज्ञानकेंद्रामध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे. ज्यांनी हरकती दाखल केल्या आहेत त्यांनी निर्धारित वेळेच्या १५ मिनिटेअगोदर हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हरकत घेतलेल्या सर्वांना पत्राद्वारे वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे.महापालिका निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पालिकेच्या स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक यांचे महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीमध्ये नाईक यांना महाविकास आघाडीने आव्हान दिले आहे. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग केला जात आहे. यामुळेही सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आरक्षणाचा फटका सर्वपक्षीय ज्येष्ठ नगरसेवकांना बसला आहे. विद्यमान महापौर जयंवत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी उपमहापौर अविनाश लाड, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी, सोमनाथ वास्कर यांच्यासह अनेक दिग्गजांना आरक्षणाचा फटका बसला आहे. ज्येष्ठ नगरसेवकांना नवीन प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे. गत निवडणुकीमध्ये आरक्षणामुळे निवडणुकीपासून दूर राहावे लागलेल्या दशरथ भगत व इतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आरक्षण पथ्यावर पडले आहे. आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक फटका शिवसेनेला बसल्याचे चित्र निर्माण झाले असून आरक्षण भाजपच्या पथ्यावर पडले आहे.कोणाला मिळणार दिलासाआरक्षणावर अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर आरक्षणामध्ये काही बदल होणार का सुनावणीनंतर कोणाला दिलासा मिळणार? ही सोडत आहे तशीच कायम राहणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका