शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

५० गाव-वाड्याचा होडी प्रवास बंद

By admin | Updated: May 15, 2016 03:58 IST

शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या महाड तालुक्यातील गोठे दासगाव असा ५० गाव-वाडीवस्तीतील नागरिकांचा होडी प्रवास बंद झाला आहे. कारण मार्चअखेर या सावित्री नदीतील होडीने वाहतूक करण्याचा ठेका संपला आहे.

सिकंदर अनवारे, दासगांवशेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या महाड तालुक्यातील गोठे दासगाव असा ५० गाव-वाडीवस्तीतील नागरिकांचा होडी प्रवास बंद झाला आहे. कारण मार्चअखेर या सावित्री नदीतील होडीने वाहतूक करण्याचा ठेका संपला आहे.महाड पंचायत समिती बांधकाम विभागाकडून नवीन ठेका होणे अपेक्षित आहे. मात्र दीड महिला उलटून गेला तरी पुढील ठेक्यासाठी हालचाल न केल्याने मागील ठेकेदाराने आपल्या होड्या बंद केल्या आहेत. याचाच फटका या ५० गावांतील नागरिकांना बसत असून खाडीपट्ट्यातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मात्र यामार्गे दर दिवशी शेकडो नागरिक होडीने दोन्ही बाजूने प्रवास करीत असतात. दासगांव हे शेकडो वर्षांपासून बंदर आहे. पूर्वीच्या काळात याच बंदराचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. या ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ होती. कोकणात जाणाऱ्या लोकांना दासगांव बंदरच एकमेव ठिकाण होते. त्यावेळी खाडीपट्ट्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड विभागातील नागरिकांसाठी बाजार खरेदी व मुंबई कोकणात जाणे व इतर ठिकाणी जाण्यासाठी जवळपास शंभरहून अधिक गावांना गोळे ते दासगाव असा सावित्री नदीमधून होडीचा प्रवास करून एकमेव मार्ग होता. मात्र आंबेत आणि टोल या दोन ठिकाणी पूल झाल्यामुळे काही गावांना या दोन पुलांचा वापर झाला. आजही ५० हून अधिक खाडी पट्ट्यातील गाव त्या ठिकाणचे शेकडो नागरिक गोठे ते दासगांव सावित्री नदीमार्गे होडीने सतत प्रवास करतात. मात्र या सावित्री नदीमध्ये दर तीन वर्षांनी महाड पंचायत समितीमार्फत होडी प्रवास वाहतूकचा ठेका लिलाव करून देण्यात येतो. मार्च २०१६ मध्ये या ठेक्याची मुदत संपली आहे. महाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून पुढील ठेका काढण्यात न आल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सावित्री नदीतील होडी मार्ग बंद पडला आहे. दासगांवमध्ये सुक्या मासळीचा आठवडा बाजार भरतो. खाडीपट्टा विभागातील हजारोंच्या संख्येने नागरिक महिला व पुरुष वर्ग या बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र होडी मार्ग बंद असल्याने या ठिकाणी असणाऱ्या रेल्वेपुलावरून चालत धोका पत्करून यावे लागत आहे. यात त्यांचा प्रवासासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळही वाया जातो. खाडीपट्ट्यातील जास्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांची खरेदी डॉक्टर, बँक व्यवहार मोठ्या प्रमाणावर दासगांव या ठिकाणीच आहेत. त्यामुळे जवळचा होडी मार्ग बंद झाल्याने खाडीपट्ट्यातील नागरिक महाड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर संतप्त झाले आहेत. दासगांवच्या आठवडा बाजारामध्ये कडधान्य मोठ्या प्रमाणावर विक्री केले जाते. सध्या मूग, मटकी, तूर, पावटा, वाल अशी अनेक कडधान्ये खाडीपट्ट्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आणतात. बंद होडीचा फटका यांना बसला असून वाहतूक वाढली. खर्च वाढल्याने नफ्यात घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.