शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

नवी मुंबईत ४५७ इमारती धोकादायक; अतिधोकादायक इमारतींचाही वापर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:13 IST

दोन लाख नागरिकांचा जीव टांगणीला

- नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरातील ४५७ इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. यामधील ६१ इमारती अतिधोकादायक असून, त्यांचा वापर तत्काळ बंद करणे आवश्यक असताना, त्यामधील ४७ इमारतींचा अद्याप वापर सुरू आहे. इमारतींच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया रखडल्यामुळे शहरातील जवळपास २ लाख नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत असून, अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मुंबईमधील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने २४ जून रोजी ४५७ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. अतिधोकादायक इमारती तत्काळ मोकळ्या करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असून, दुरुस्ती करणे शक्य आहे, अशा इमारतींची विनाविलंब दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक, प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका ही यादी प्रसिद्ध करत असते. औपचारिकता व स्वत:च्या जबाबदारी झटकण्यासाठीच हा प्रकार केला जात असल्याची टीका होऊ लागली आहे.

अतिधोकादायक इमारतींमध्येही नागरिक वास्तव्य करत आहेत. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अनेक प्रस्ताव महानगरपालिकेला सादर करण्यात आले आहेत, परंतु या प्रकल्पांना वेळेत परवानगी दिली जात नाही. यामुळे नाईलाजाने नागरिकांना धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांमध्ये पुनर्बांधणीवरून मतभेद असून, त्यामुळे पुनर्बांधणीचे काम रखडत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील कांदा-बटाटा मार्केटही अतिधोकादायक असून, तेथे प्रतिदिन पाच हजारांपेक्षा जास्त नागरिक काम करत आहेत. मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह ही इमारतही धोकादायक घोषित केली आहे. सदर इमारतीमध्ये जवळपास दोन हजार नागरिकांची प्रतिदिन ये-जा सुरू असते. या इमातीचाही वापर अद्याप सुरूच आहे.

एपीएमसीजवळी अनेक कोल्डस्टोरेज व एक दूध डेअरी प्रकल्पाची इमारतही धोकादायक घोषित केली आहे. या इमारतींमध्येही शेकडो नागरिक काम करत आहेत. मागील वर्षभरात शहरात सहा ठिकाणी प्लास्टरचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. धोकादायक घोषित केलेल्या सर्व इमारतींमध्ये जवळपास २ लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. यापैकी एखादी इमारत कोसळून जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महानगरपालिका प्रशासनाने दुरुस्तीयोग्य इमारती तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या पाहिजेत. दुरुस्ती न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविला पाहिजे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. अनेक इमारती जर्जर झाल्या असून, कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. महानगरपालिकेने पुनर्बांधणीचा प्रश्न लवकर मार्गी लावला, तरच हा प्रश्न सुटणार आहे.- किशोर पाटकर, उपजिल्हा प्रमुख शिवसेना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई