शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:31 IST

गर्दीच्या ठिकाणांवर पाळत

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  नवी मुंबईसह पनवेल मधून दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अथवा एकट्या पादचाऱ्याला गाठून चोरटयांनी हा डाव साधलेला आहे. मात्र त्यापैकी केवळ १८१ मोबाईल पुन्हा मिळाले आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोबाईल चोरटे वाढले आहेत. पहाटेच्या सुमारास अनेकजण घराचा दरवाजा उघडा ठेवून घरातले काम करतात. अथवा एखादी व्यक्ती घराबाहेर घेल्यास दरवाजा उघडाच राहतो. अशा उघड्या घरांवर पाळत ठेवून दरवाजातून किंवा खिडकीतून मोबाईल चोरले जात आहेत. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी, बस थांब्यावर देखील हातातले किंवा खिशातले मोबाइल मारले जात आहेत. तर रात्रीच्या वेळी एकट्या पादचाऱ्याला गाठून मोबाइल चोरल्याचा घटना घडल्या आहेत. त्यानुसार दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ १८१ गुन्ह्यांची उकल होऊन त्यामधील मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. इतर गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसून त्यामधील मोबाइल पोलीस अथवा संबंधितांच्या हाती लागलेले नाहीत.गर्दीच्या ठिकाणी सतर्कता गरजेची मोबाइल चोरी करणाऱ्या टोळ्या गर्दीच्या ठिकाणी आपली हातसफाई दाखवत असतात. यामुळे बसथांबे, बस, रेल्वे अशा ठिकाणी ते दबा धरून बसलेले असतात. एखादी व्यक्ती बेसावध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांच्याकडून हातसफाईने मोबाइल चोरला जातो. तर अनेकदा एकटा प्रवासी बघून आडोशाच्या ठिकाणी त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळवला जातो. यामुळे पादचाऱ्यांमध्येदेखील चोरट्यांची दहशत पसरत आहे. गुन्हेगारांकडून होऊ शकतो गैरवापर मोबाइल हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. अनेकदा चोरीला गेलेला मोबाइल गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे मोबाइल चोरीची तक्रार दाखल असल्यास संबंधितावरील संकट टळू शकते. शिवाय हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये असलेली ट्रॅकिंगची सुविधादेखील वापरली जाणे गरजेचे आहे. तर मोबाइलमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे बँकिंग किंवा इतर ॲप्लिकेशनदेखील पासवर्डने लॉक ठेवणे गरजेचे आहे. हरवले ४०२, सापडले १८१ लॉकडाऊनमुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. २०१९ मध्ये २३० मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत्या. मात्र गतवर्षात केवळ १७२ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एकूण १८१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामध्ये गतवर्षी ८१ तर २०१९ मध्ये १०० गुन्हे उघड झाले आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांत ठरावीक टोळीचा किंवा एखाद्या चोरट्याचा समावेश आढळून आला आहे. त्यात बहुतांश चोरटे शहराबाहेरील आहेत.या मोबाइलचा वापर गुन्ह्यासाठी होऊ शकतो. यामुळे गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचे आहे. तर रस्त्याने चालताना अथवा दुचाकीवर असताना हातात मोबाइल ठेवू नये. घरातदेखील दरवाजा व खिडकीच्या जवळपास मोबाइल ठेवू नये. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १सागरी पोलीस ठाण्याच्या गस्ती

टॅग्स :theftचोरी