शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:31 IST

गर्दीच्या ठिकाणांवर पाळत

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  नवी मुंबईसह पनवेल मधून दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अथवा एकट्या पादचाऱ्याला गाठून चोरटयांनी हा डाव साधलेला आहे. मात्र त्यापैकी केवळ १८१ मोबाईल पुन्हा मिळाले आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोबाईल चोरटे वाढले आहेत. पहाटेच्या सुमारास अनेकजण घराचा दरवाजा उघडा ठेवून घरातले काम करतात. अथवा एखादी व्यक्ती घराबाहेर घेल्यास दरवाजा उघडाच राहतो. अशा उघड्या घरांवर पाळत ठेवून दरवाजातून किंवा खिडकीतून मोबाईल चोरले जात आहेत. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी, बस थांब्यावर देखील हातातले किंवा खिशातले मोबाइल मारले जात आहेत. तर रात्रीच्या वेळी एकट्या पादचाऱ्याला गाठून मोबाइल चोरल्याचा घटना घडल्या आहेत. त्यानुसार दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ १८१ गुन्ह्यांची उकल होऊन त्यामधील मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. इतर गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसून त्यामधील मोबाइल पोलीस अथवा संबंधितांच्या हाती लागलेले नाहीत.गर्दीच्या ठिकाणी सतर्कता गरजेची मोबाइल चोरी करणाऱ्या टोळ्या गर्दीच्या ठिकाणी आपली हातसफाई दाखवत असतात. यामुळे बसथांबे, बस, रेल्वे अशा ठिकाणी ते दबा धरून बसलेले असतात. एखादी व्यक्ती बेसावध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांच्याकडून हातसफाईने मोबाइल चोरला जातो. तर अनेकदा एकटा प्रवासी बघून आडोशाच्या ठिकाणी त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळवला जातो. यामुळे पादचाऱ्यांमध्येदेखील चोरट्यांची दहशत पसरत आहे. गुन्हेगारांकडून होऊ शकतो गैरवापर मोबाइल हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. अनेकदा चोरीला गेलेला मोबाइल गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे मोबाइल चोरीची तक्रार दाखल असल्यास संबंधितावरील संकट टळू शकते. शिवाय हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये असलेली ट्रॅकिंगची सुविधादेखील वापरली जाणे गरजेचे आहे. तर मोबाइलमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे बँकिंग किंवा इतर ॲप्लिकेशनदेखील पासवर्डने लॉक ठेवणे गरजेचे आहे. हरवले ४०२, सापडले १८१ लॉकडाऊनमुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. २०१९ मध्ये २३० मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत्या. मात्र गतवर्षात केवळ १७२ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एकूण १८१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामध्ये गतवर्षी ८१ तर २०१९ मध्ये १०० गुन्हे उघड झाले आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांत ठरावीक टोळीचा किंवा एखाद्या चोरट्याचा समावेश आढळून आला आहे. त्यात बहुतांश चोरटे शहराबाहेरील आहेत.या मोबाइलचा वापर गुन्ह्यासाठी होऊ शकतो. यामुळे गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचे आहे. तर रस्त्याने चालताना अथवा दुचाकीवर असताना हातात मोबाइल ठेवू नये. घरातदेखील दरवाजा व खिडकीच्या जवळपास मोबाइल ठेवू नये. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १सागरी पोलीस ठाण्याच्या गस्ती

टॅग्स :theftचोरी