शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:31 IST

गर्दीच्या ठिकाणांवर पाळत

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  नवी मुंबईसह पनवेल मधून दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अथवा एकट्या पादचाऱ्याला गाठून चोरटयांनी हा डाव साधलेला आहे. मात्र त्यापैकी केवळ १८१ मोबाईल पुन्हा मिळाले आहेत.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोबाईल चोरटे वाढले आहेत. पहाटेच्या सुमारास अनेकजण घराचा दरवाजा उघडा ठेवून घरातले काम करतात. अथवा एखादी व्यक्ती घराबाहेर घेल्यास दरवाजा उघडाच राहतो. अशा उघड्या घरांवर पाळत ठेवून दरवाजातून किंवा खिडकीतून मोबाईल चोरले जात आहेत. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी, बस थांब्यावर देखील हातातले किंवा खिशातले मोबाइल मारले जात आहेत. तर रात्रीच्या वेळी एकट्या पादचाऱ्याला गाठून मोबाइल चोरल्याचा घटना घडल्या आहेत. त्यानुसार दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ १८१ गुन्ह्यांची उकल होऊन त्यामधील मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. इतर गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसून त्यामधील मोबाइल पोलीस अथवा संबंधितांच्या हाती लागलेले नाहीत.गर्दीच्या ठिकाणी सतर्कता गरजेची मोबाइल चोरी करणाऱ्या टोळ्या गर्दीच्या ठिकाणी आपली हातसफाई दाखवत असतात. यामुळे बसथांबे, बस, रेल्वे अशा ठिकाणी ते दबा धरून बसलेले असतात. एखादी व्यक्ती बेसावध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांच्याकडून हातसफाईने मोबाइल चोरला जातो. तर अनेकदा एकटा प्रवासी बघून आडोशाच्या ठिकाणी त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळवला जातो. यामुळे पादचाऱ्यांमध्येदेखील चोरट्यांची दहशत पसरत आहे. गुन्हेगारांकडून होऊ शकतो गैरवापर मोबाइल हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. अनेकदा चोरीला गेलेला मोबाइल गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे मोबाइल चोरीची तक्रार दाखल असल्यास संबंधितावरील संकट टळू शकते. शिवाय हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये असलेली ट्रॅकिंगची सुविधादेखील वापरली जाणे गरजेचे आहे. तर मोबाइलमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे बँकिंग किंवा इतर ॲप्लिकेशनदेखील पासवर्डने लॉक ठेवणे गरजेचे आहे. हरवले ४०२, सापडले १८१ लॉकडाऊनमुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. २०१९ मध्ये २३० मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत्या. मात्र गतवर्षात केवळ १७२ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एकूण १८१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामध्ये गतवर्षी ८१ तर २०१९ मध्ये १०० गुन्हे उघड झाले आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांत ठरावीक टोळीचा किंवा एखाद्या चोरट्याचा समावेश आढळून आला आहे. त्यात बहुतांश चोरटे शहराबाहेरील आहेत.या मोबाइलचा वापर गुन्ह्यासाठी होऊ शकतो. यामुळे गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचे आहे. तर रस्त्याने चालताना अथवा दुचाकीवर असताना हातात मोबाइल ठेवू नये. घरातदेखील दरवाजा व खिडकीच्या जवळपास मोबाइल ठेवू नये. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १सागरी पोलीस ठाण्याच्या गस्ती

टॅग्स :theftचोरी