शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वेतनवाढीसाठी ४०० कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:28 IST

आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले.

उरण : चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, कामगारांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बाहेरून कामगार आणून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. आंदोलनादरम्यान व्यवस्थापनाकडून कामगारांनाही मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.आशिया खंडात एकूण १८ प्रोजेक्ट असलेल्या साई येथील आर्शिया गोदाम उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने शेतकऱ्यांनीही आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावात कंपनीसाठी दिल्या.कंपनीत येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेले कामगार लेबर, सुपरवायझर, हाउसकिपिंग, सिक्युरिटी, सर्व्हेअर, आरटी आॅपरेटर, बीओएल आॅपरेटर व पँटरीबॉय अशा विविध पदांंवर एकूण ४०० कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यात २५ महिला कामगारांचाही समावेश आहे.मागील महिन्यांपासून वेतनवाढीच्या मागणीसाठी कामगारांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर बोलणी सुरू होती. त्यानंतर वेतनवाढीचा करारही करण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी केलेल्या करारानुसार, वेतन देण्याच्या मागणीप्रमाणे कामगारांना वेतन दिले जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतरही वेतनवाढीच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याच्या निषेधार्थ ४०० कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आर्शिया लॉजिस्टिक व्यवस्थापनाने या कामगारांना विश्वासात न घेता, तत्काळ बाहेरून कामगार आणून कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेलेले कामगार समाधान कृष्णा तांडेल (३२) यांना व्यवस्थापनाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.कंपनी व्यवस्थापन कराराप्रमाणे कामगारांना वेतन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. तसेच बळाचा वापर करीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आर्शिया करत असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. ४०० संघटित कामगारांनी आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस विरोधातील काम बंद आंदोलन आणखीनच तीव्र केले आहे. व्यवस्थापन आणि कामगारांमधील संघर्ष आणखीनच पेटला आहे.