शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वेतनवाढीसाठी ४०० कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:28 IST

आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले.

उरण : चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, कामगारांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बाहेरून कामगार आणून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. आंदोलनादरम्यान व्यवस्थापनाकडून कामगारांनाही मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.आशिया खंडात एकूण १८ प्रोजेक्ट असलेल्या साई येथील आर्शिया गोदाम उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने शेतकऱ्यांनीही आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावात कंपनीसाठी दिल्या.कंपनीत येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेले कामगार लेबर, सुपरवायझर, हाउसकिपिंग, सिक्युरिटी, सर्व्हेअर, आरटी आॅपरेटर, बीओएल आॅपरेटर व पँटरीबॉय अशा विविध पदांंवर एकूण ४०० कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यात २५ महिला कामगारांचाही समावेश आहे.मागील महिन्यांपासून वेतनवाढीच्या मागणीसाठी कामगारांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर बोलणी सुरू होती. त्यानंतर वेतनवाढीचा करारही करण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी केलेल्या करारानुसार, वेतन देण्याच्या मागणीप्रमाणे कामगारांना वेतन दिले जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतरही वेतनवाढीच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याच्या निषेधार्थ ४०० कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आर्शिया लॉजिस्टिक व्यवस्थापनाने या कामगारांना विश्वासात न घेता, तत्काळ बाहेरून कामगार आणून कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेलेले कामगार समाधान कृष्णा तांडेल (३२) यांना व्यवस्थापनाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.कंपनी व्यवस्थापन कराराप्रमाणे कामगारांना वेतन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. तसेच बळाचा वापर करीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आर्शिया करत असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. ४०० संघटित कामगारांनी आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस विरोधातील काम बंद आंदोलन आणखीनच तीव्र केले आहे. व्यवस्थापन आणि कामगारांमधील संघर्ष आणखीनच पेटला आहे.