शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांमध्ये ४०० कोटींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:04 IST

दोन सर्वसाधारण सभांचे आयोजन : निवडणुकांमुळे नवी मुंबईत विकासाची घाई

नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासकामे मार्गी लावण्याची घाई सुरू झाली आहे. २० आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेमध्ये २६८ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्येही जवळपास १३० कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मांडले जाणार असून दहा दिवसांमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ७ मार्चला सर्वसाधारण सभेने याला मंजुरी दिली असून, त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. यामुळे मे अखेरपर्यंत नवीन अर्थसंकल्पातील कोणतीही कामे करता आली नाहीत. यानंतर आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागणार असून, आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्वसाधारण सभा घेता येणार नाही, त्यानंतर २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षात निवडणुकांमुळे मोठा कालावधी जाणार असल्यामुळे आॅगस्टमध्ये जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याची प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. २० आॅगस्टला सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्या सभेमध्ये तब्बल २६८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल ६९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

अनेक प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. ३० आॅगस्टला पुन्हा विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्येही जवळपास १२२ कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. या वर्षभरामध्ये प्रथमच दहा दिवसांमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जाणार आहे.

निवडणुका जवळ आल्या की महापालिकेमध्ये विकासकामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला जातो. अत्यंत घाई-गडबडीमध्ये प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. यामुळे प्रस्तावांमधील त्रुटी दूर करता येत नाहीत. यापूर्वी ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या प्रस्तावालाही अशाचप्रकारे घाई गडबडीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. कमी आसनक्षमता व इतर गोष्टींमुळे पाच वर्षांमध्ये नाट्यगृहाचे काम पूर्ण झालेले नाही.

पाच वर्षांपूर्वी निवडणुकांच्या अगोदरच मोरबे धरण परिसरामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या २०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. तो प्रस्तावही मार्गी लागू शकलेला नाही. यामुळे या वेळीही गडबडीत प्रस्ताव मंजूर करून महापालिकेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून मंजुरी दिली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.बोनसरी नाल्याला संरक्षण भिंतच्मुसळधार पावसामुळे एमआयडीसीमधील बोनसरी झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले होते. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. येणाºया सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असून त्यासाठी ५ कोटी ७२ लाख रुपये खर्च होणार आहेत.

कोपरखैरणेमध्ये रात्रनिवारा केंद्रच्महापालिकेने बेघरांसाठी रात्रनिवारा केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणे सेक्टर २ मध्ये नवीन केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी २ कोटी ६ लाख रुपये खर्च होणार असून विशेष सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.नेरुळ पादचारी पुलाची दुरुस्तीच्नेरुळ सेक्टर ८ व सेक्टर २९ पूर्व व पश्चिम विभागास जोडणारा रेल्वे पादचारी पूल धोकादायक झाला आहे. पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याचा वापर थांबविण्यात आला आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून दुरुस्तीसाठी ३१ लाख ३७ हजार रुपये रेल्वेकडे वर्ग करण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे.