शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा-विरार सेतूला ४० हजार कोटींचे कर्ज, एमएमआरडीएकडे सर्व कागदपत्रे  देण्याचे आदेश

By नारायण जाधव | Updated: November 13, 2022 10:14 IST

Versova-Virar Bridge : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता  एमएमआरडीए बांधणार आहे. जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे

- नारायण जाधव नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधित असलेल्या वर्सोवा-विरार सागरी सेतू आता  एमएमआरडीए बांधणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अर्थसाहाय्य  करणाऱ्या जपानच्या जायका कंपनीने या रस्त्यासाठी ४० हजार कोटींचे अर्थसाहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे.  यामुळे या मार्गाचे कामही लवकरात लवकरात हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या मार्गासाठी आता ३२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तो ४० हजार कोटींच्या गेला असून, त्यासाठी जायका अर्थसाहाय्य देण्यास तयार असल्याचे महानगर आयुक्तांनी ऑक्टोबर महिन्याच्या एमएमआरडीएच्या  बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितले.

रस्ते विकास महामंडळाने दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांसह उत्तर मुंबईला जोडणाऱ्या वर्सोवा ते विरार ते या ५४ किमीच्या तिसऱ्या सी-लिंकच्या सुसाध्यता अहवालास सप्टेंबर २०२१  मान्यता दिली. होती. सध्या वरळी ते वांद्रा सागरी सेतूनंतर आता वांद्रा ते वर्साेवा या १७.७ किमीच्या सागरी पुलाच्या बांधकामाचे सात हजार कोटींच्या कंत्राटाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या पुलामुळे वांद्रा ते वर्सोवा हे दोन तासांचे अंतर हा पूल झाल्यावर १५ मिनिटांत कापता येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११ हजार ३३२ कोटींचा आहे. 

सल्लागार नेमण्याचे आदेश एमएसआरडीसीने सर्व कागदपत्रे एमएमआरडीएला देण्याचे आदेश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. ते मिळाल्यानंतर एमएसआरडीने ते संचालक मंडळासमोर ठेवून तातडीने सल्लागार नेमण्याची कार्यवाही करावी, असेही या बैठकीत ठरले आहे.

भाईंदर-वसई खाडीपुलास लाभविस्तारित वर्सोवा-विरार सागरी सेतूचा एमएमआरडीएच्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडीपुलासही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.भाईंदर खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून, तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे. या पुलावर एमएमआरडीए १० हजार ८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. 

नवी मुंबई विमानतळाला होणार फायदा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा संपूर्ण सागरी मार्ग भविष्यात ईस्टर्न फ्री वे आणि विरार-कॉरिडोरसह न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंकला जोडण्यात येणार आहे.  यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक जवळ येतीलच; शिवाय दक्षिण मुंबईसह नवी मुंबई गाठणेही अधिक सुकर होणार आहे. याचा फायदा भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणार आहे.