शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

कळंबोलीतील ६० कुटुंबे भीतीच्या छायेत; जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:43 IST

३० तासांनंतरही हालचाली नाहीत; इमारत जमीनदोस्त करण्याच्या खर्चावरून वाद

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर ३ ई येथील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळल्याने इमारतीच्या मागील तसेच बाजूला असलेली जवळपास ६० घरे पनवेल महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ खाली केलीत. या वेळी एका दिवसात उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले; परंतु शुक्रवारचा पूर्ण दिवस गेला तरी या बाबत काहीच हालचाली होत नसल्याने रहिवाशांमधून रोष व्यक्त होत आहे.कळंबोली सिडको वसाहतीतील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला. या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे खाली करण्यास सांगितले. त्यानुसार सदनिकाधारकांनी घरे खाली केली. शुक्रवारी सकाळी इमारत पाडण्यात येणार असल्याने येथील रहिवाशांनी नातेवाइकांकडे आसरा घेतल्याचे विलास माने या रहिवाशांनी सांगितले. मात्र, शुक्रवारी संध्याकाळचे ६ वाजेपर्यंत कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतल्याने कामात अडथळा आला नसता. मात्र, महापालिका व रिधिमा सोसायटीधारक एकमेकांकडे बोट दाखवत इमारत पाडण्याचा खर्च करायचा कोणी? यावर चर्चा करण्यात दोन दिवस गेले.इमारत पुनर्बांधणीसाठी सिडकोने आम्हाला परवानगी दिलेली नाही. २०११ पासून सदनिकाधारकांनी देखभालीसाठी खर्च जमा करणे बंद केले आहे. तेव्हा इमारत महापालिकेने जमीनदोस्त करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी होती. तसे महापालिकेने इमारत पाडण्यास होकारही दिला; पण खर्च मोठ्या प्रमाणात येईल. येणारा खर्च रिधिमा सोसायटीने महापालिकेला भरला तरच पुनर्बांधणीसाठी परवानगी मिळेल, असा उपायुक्त यांनी सोसायटीधारकांसमोर खुलासा केल्याचे समजते. रिधिमा सोसायटीच्या बाजूला असलेली कृषिधन इमारत तसेच पाठीमागील सिडकोची ई १ टाइपमध्ये २०० रहिवासी वास्तव्यास आहेत. आम्ही किती दिवस घराबाहेर राहायचे, असा प्रश्न रहिवासी विचारात आहेत.ऐतिहासिक बापट वाडा मोजतोय अखेरची घटकापनवेल शहरातील सुमारे २७५ वर्षांची साक्ष देणारा ऐतिहासिक बापट वाडा सध्याच्या घडीला अखेरची घटका मोजत आहे. शुक्रवारी बापट वाड्याचा काही भाग कोसळल्याचे पालिकेने गांभीर्य लक्षात घेता धोकादायक भाग जमीनदोस्त केला. वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेलची ओळख होती. त्यापैकीच एक बापट वाडा असून दरवर्षी याठिकाणी कृष्णजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. पनवेल महानगर पालिकेने संबंधित बापट वाड्याला धोकादायक घोषित केले आहे. सध्याच्या घडीला वाड्यात काही रहिवासी वास्तव्यास आहेत. पालिकेचे ड प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी धोकादायक असलेल्या बापट वाड्याला तत्काळ नव्याने नोटीस बजावली आहे.या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या असल्याचे हजारे यांनी सांगितले. पनवेल शहरात सध्याच्या घडीला ६० धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे, २० ते २५ धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. रहिवासी व बांधकाम व्यावसायिकांचा वादामुळे अनेक जण घरे रिकामी करत नाहीत.मोडकळीस आलेली रिधिमा इमारत सोसायटीधारकांकडूनच पाडण्यात येणार आहे. या बाबत सदनिकाधारकांशी चर्चा केली आहे. मशिन तसेच येणारा खर्च सोसायटीकडून केला जाणार आहे. यासाठी सुमारे साडेपाच लाख खर्च अपेक्षित आहे. मशिन आल्यानंतर पाडण्यास सुरुवात केली जाईल.- कैलास सिंग, रहिवासी, रिधिमा सोसायटी