शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

कळंबोलीतील ६० कुटुंबे भीतीच्या छायेत; जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:43 IST

३० तासांनंतरही हालचाली नाहीत; इमारत जमीनदोस्त करण्याच्या खर्चावरून वाद

कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर ३ ई येथील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळल्याने इमारतीच्या मागील तसेच बाजूला असलेली जवळपास ६० घरे पनवेल महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ खाली केलीत. या वेळी एका दिवसात उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले; परंतु शुक्रवारचा पूर्ण दिवस गेला तरी या बाबत काहीच हालचाली होत नसल्याने रहिवाशांमधून रोष व्यक्त होत आहे.कळंबोली सिडको वसाहतीतील धोकादायक रिधिमा इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला. या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या पाठीमागील ई १ टाइपमधील ४० घरे तसेच बाजूला असलेल्या कृषिधन सोसायटीतील १८ घरे खाली करण्यास सांगितले. त्यानुसार सदनिकाधारकांनी घरे खाली केली. शुक्रवारी सकाळी इमारत पाडण्यात येणार असल्याने येथील रहिवाशांनी नातेवाइकांकडे आसरा घेतल्याचे विलास माने या रहिवाशांनी सांगितले. मात्र, शुक्रवारी संध्याकाळचे ६ वाजेपर्यंत कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतल्याने कामात अडथळा आला नसता. मात्र, महापालिका व रिधिमा सोसायटीधारक एकमेकांकडे बोट दाखवत इमारत पाडण्याचा खर्च करायचा कोणी? यावर चर्चा करण्यात दोन दिवस गेले.इमारत पुनर्बांधणीसाठी सिडकोने आम्हाला परवानगी दिलेली नाही. २०११ पासून सदनिकाधारकांनी देखभालीसाठी खर्च जमा करणे बंद केले आहे. तेव्हा इमारत महापालिकेने जमीनदोस्त करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी होती. तसे महापालिकेने इमारत पाडण्यास होकारही दिला; पण खर्च मोठ्या प्रमाणात येईल. येणारा खर्च रिधिमा सोसायटीने महापालिकेला भरला तरच पुनर्बांधणीसाठी परवानगी मिळेल, असा उपायुक्त यांनी सोसायटीधारकांसमोर खुलासा केल्याचे समजते. रिधिमा सोसायटीच्या बाजूला असलेली कृषिधन इमारत तसेच पाठीमागील सिडकोची ई १ टाइपमध्ये २०० रहिवासी वास्तव्यास आहेत. आम्ही किती दिवस घराबाहेर राहायचे, असा प्रश्न रहिवासी विचारात आहेत.ऐतिहासिक बापट वाडा मोजतोय अखेरची घटकापनवेल शहरातील सुमारे २७५ वर्षांची साक्ष देणारा ऐतिहासिक बापट वाडा सध्याच्या घडीला अखेरची घटका मोजत आहे. शुक्रवारी बापट वाड्याचा काही भाग कोसळल्याचे पालिकेने गांभीर्य लक्षात घेता धोकादायक भाग जमीनदोस्त केला. वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेलची ओळख होती. त्यापैकीच एक बापट वाडा असून दरवर्षी याठिकाणी कृष्णजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. पनवेल महानगर पालिकेने संबंधित बापट वाड्याला धोकादायक घोषित केले आहे. सध्याच्या घडीला वाड्यात काही रहिवासी वास्तव्यास आहेत. पालिकेचे ड प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी धोकादायक असलेल्या बापट वाड्याला तत्काळ नव्याने नोटीस बजावली आहे.या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या असल्याचे हजारे यांनी सांगितले. पनवेल शहरात सध्याच्या घडीला ६० धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे, २० ते २५ धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. रहिवासी व बांधकाम व्यावसायिकांचा वादामुळे अनेक जण घरे रिकामी करत नाहीत.मोडकळीस आलेली रिधिमा इमारत सोसायटीधारकांकडूनच पाडण्यात येणार आहे. या बाबत सदनिकाधारकांशी चर्चा केली आहे. मशिन तसेच येणारा खर्च सोसायटीकडून केला जाणार आहे. यासाठी सुमारे साडेपाच लाख खर्च अपेक्षित आहे. मशिन आल्यानंतर पाडण्यास सुरुवात केली जाईल.- कैलास सिंग, रहिवासी, रिधिमा सोसायटी