शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

३८४ कामगारांसाठी न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:25 IST

पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश पालिकेत करण्यात आला.

वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश पालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतीतीत ३८४ कामगारांना पालिकेत सामावून घेण्यात आले. मात्र आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आयुक्तपदाचा पदभार हाती घेतल्यांनंतर संबंधित ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात कामगारांची अनावश्यक भरती झाल्याचा ठपका ठेवत कामगारांचा सहा महिन्यांचा पगार रोखून धरला. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा निर्णय अद्याप बाकी आहे मात्र कामगारांच्या प्रश्नावर पालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवक गंभीर असून यासंदर्भात गरज भासल्यास न्यायालयात जावू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.पनवेल महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील नगरसेवक हरेश केणी यांनी लक्षवेधी मांडली होती. ग्रामपंचायतीमधील कामगारांना पालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम ४९३ मध्ये स्पष्ट तरतूद असताना पालिका प्रशासन आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. यासंदर्भात समिती स्थापन करण्याची गरजच नव्हती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका या कामगारांना मागील आठ ते नऊ महिन्यापासून राबवून घेत आहे. यापैकी सहा महिन्यांचा पगार कामगारांना पालिकेने दिला असला तरी अजून तीन महिन्यांचा पगार रोखून धरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा न काढल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे नगरसेवक हरेश केणी यांनी सांगितले. कामगार संघटना देखील या विषयावर गंभीर असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचे अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.>काय आहे कामगारभरती प्रकरण ?पनवेल महापालिकेत २३ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी ही भरती आरक्षणानुसार देखील झाली नसल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे. ज्या ठिकाणी ५ जागांची आवश्यकता होती त्याठिकाणी ३० ते ४० कामगारांची भरती केली असल्यामुळे हा कामगारांना पालिकेत सामावून घेण्यासंदर्भात पालिका प्रशासन तयार नसल्याचे बोलले जाते.>कामगारांच्या भरतीसंदर्भात समितीची स्थापनाकामगारांच्या भरतीत अनियमितता असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अंतिम अहवाल काही दिवसातच समोर येईल. त्यामुळे समितीच्या अहवालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.>सत्ताधाºयांपेक्षा विरोधक कामगारांच्या पाठीशीपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये शेकापची सत्ता होती. त्यांच्यामार्फत अनेक कामगारांची भरती झाली असल्यामुळे सत्ताधारी भाजपा या विषयावर गप्प असल्याचे बोलले जाते. मात्र शेकाप या कामगारांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगत आले आहे. कामगारांनी काढलेल्या मोर्च्यात शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील हे उघडपणे मोर्च्यात सहभागी झाले होते . भाजपाच्या नेत्यांनी मात्र या मोर्च्यात सहभाग घेतला नव्हता.