शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

३८४ कामगारांसाठी न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:25 IST

पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश पालिकेत करण्यात आला.

वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश पालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतीतीत ३८४ कामगारांना पालिकेत सामावून घेण्यात आले. मात्र आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आयुक्तपदाचा पदभार हाती घेतल्यांनंतर संबंधित ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात कामगारांची अनावश्यक भरती झाल्याचा ठपका ठेवत कामगारांचा सहा महिन्यांचा पगार रोखून धरला. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा निर्णय अद्याप बाकी आहे मात्र कामगारांच्या प्रश्नावर पालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवक गंभीर असून यासंदर्भात गरज भासल्यास न्यायालयात जावू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.पनवेल महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील नगरसेवक हरेश केणी यांनी लक्षवेधी मांडली होती. ग्रामपंचायतीमधील कामगारांना पालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम ४९३ मध्ये स्पष्ट तरतूद असताना पालिका प्रशासन आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. यासंदर्भात समिती स्थापन करण्याची गरजच नव्हती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पालिका या कामगारांना मागील आठ ते नऊ महिन्यापासून राबवून घेत आहे. यापैकी सहा महिन्यांचा पगार कामगारांना पालिकेने दिला असला तरी अजून तीन महिन्यांचा पगार रोखून धरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा न काढल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे नगरसेवक हरेश केणी यांनी सांगितले. कामगार संघटना देखील या विषयावर गंभीर असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचे अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.>काय आहे कामगारभरती प्रकरण ?पनवेल महापालिकेत २३ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्यानंतर अनेक ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी ही भरती आरक्षणानुसार देखील झाली नसल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे. ज्या ठिकाणी ५ जागांची आवश्यकता होती त्याठिकाणी ३० ते ४० कामगारांची भरती केली असल्यामुळे हा कामगारांना पालिकेत सामावून घेण्यासंदर्भात पालिका प्रशासन तयार नसल्याचे बोलले जाते.>कामगारांच्या भरतीसंदर्भात समितीची स्थापनाकामगारांच्या भरतीत अनियमितता असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अंतिम अहवाल काही दिवसातच समोर येईल. त्यामुळे समितीच्या अहवालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.>सत्ताधाºयांपेक्षा विरोधक कामगारांच्या पाठीशीपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतीपैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये शेकापची सत्ता होती. त्यांच्यामार्फत अनेक कामगारांची भरती झाली असल्यामुळे सत्ताधारी भाजपा या विषयावर गप्प असल्याचे बोलले जाते. मात्र शेकाप या कामगारांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगत आले आहे. कामगारांनी काढलेल्या मोर्च्यात शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील हे उघडपणे मोर्च्यात सहभागी झाले होते . भाजपाच्या नेत्यांनी मात्र या मोर्च्यात सहभाग घेतला नव्हता.