शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मुंबईत ४ वर्षांत ३२ हजार बाल मृत्यू

By admin | Updated: November 25, 2015 01:23 IST

संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे.

मीरा रोड : संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईमध्ये चार वर्षांत ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची माहिती जागतिक नवजात बालक काळजी सप्ताहानिमित्त मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित वात्सल्य उपक्रमप्रसंगी नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. समीर शेख यांनी दिली.२००८ पासून २०१२ पर्यंत एकट्या मुंबईसारख्या प्रगतिशील शहरात ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यावरून मुंबईत दरमहा सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू होणे चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जगभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूपैकी २४ टक्के इतके मृत्यूचे प्रमाण भारतातील आहे. गेल्या वर्षापेक्षा हे प्रमाण कमी झाले असून क्रमवारीत ६३ व्या स्थानावरून ५३ व्या स्थानावर भारत आल्याचे ते म्हणाले. देशातील २० कोटी जनता आजही उपाशीपोटी जगत आहे. चारपैकी एक बालक कुपोषणबाधित असून देशात रोज ३ हजार मुलांचा कुपोषण व त्यामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होतो. (प्रतिनिधी)