शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

मुंबईत ४ वर्षांत ३२ हजार बाल मृत्यू

By admin | Updated: November 25, 2015 01:23 IST

संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे.

मीरा रोड : संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईमध्ये चार वर्षांत ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची माहिती जागतिक नवजात बालक काळजी सप्ताहानिमित्त मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात आयोजित वात्सल्य उपक्रमप्रसंगी नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. समीर शेख यांनी दिली.२००८ पासून २०१२ पर्यंत एकट्या मुंबईसारख्या प्रगतिशील शहरात ३२ हजार ६६४ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने प्रसिद्ध केली आहे. त्यावरून मुंबईत दरमहा सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू होणे चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जगभरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूपैकी २४ टक्के इतके मृत्यूचे प्रमाण भारतातील आहे. गेल्या वर्षापेक्षा हे प्रमाण कमी झाले असून क्रमवारीत ६३ व्या स्थानावरून ५३ व्या स्थानावर भारत आल्याचे ते म्हणाले. देशातील २० कोटी जनता आजही उपाशीपोटी जगत आहे. चारपैकी एक बालक कुपोषणबाधित असून देशात रोज ३ हजार मुलांचा कुपोषण व त्यामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होतो. (प्रतिनिधी)