शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
5
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
6
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
7
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
8
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
9
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
10
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
11
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
12
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
13
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
14
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
15
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
16
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
17
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
18
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
19
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
20
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

नवी मुंबईत सात वर्षांत 25 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण; श्वान नियंत्रण अभियान यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:03 IST

२२ हजार भटक्या कुत्र्यांवर उपचार

नामदेव मोरेनवी मुंबई :  भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेने श्वान नियंत्रण उपक्रम सुरू केला आहे. सात वर्षांत तब्बल ४९२२४ कुत्री पकडली असून त्यामधील २५१३१ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. २२३९७ कुत्र्यांवर उपचार करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ९० टक्के भटक्या कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यात यश आले असून श्वान नियंत्रणाचा नवी मुंबई पॅटर्न राज्यभर राबविण्याची मागणी होत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक महानगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. रात्री अनेक रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत पाहावयास मिळते. कुत्रे मागे लागल्यामुळे मोटरसायकलचे अपघात होण्याच्या घटनाही होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने २००६ पासून श्वान नियंत्रण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. इन डिफेन्स ऑफ ॲनिमल संस्थेला हे काम देण्यात आले होते. कोपरीमधील केंद्र मोडकळीस आल्यामुळे सद्यस्थितीमध्ये तुर्भे डम्पिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात श्वान नियंत्रण केंद्र उभारून तेथे हे काम सुरू केले आहे. २०१४ पासून श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात आली आहे. तुर्भेमधील केंद्रामध्ये सुरुवातीला ३०० ते ५०० श्वानांवर शस्त्रक्रिया केली जात होती. शस्त्रक्रिया केलेल्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ९० टक्के श्वानांवर शस्त्रक्रिया झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे श्वान नियंत्रणाचे अभियान यशस्वी झाले आहे. शस्त्रक्रियेसाठी आता श्वान पुरेशा प्रमाणात सापडत नाहीत. सद्यस्थितीमध्ये महिन्याला १२५च्या दरम्यान शस्त्रक्रिया होत आहेत. महानगरपालिकेने समान कामास समान वेतन नियमाप्रमाणे श्वान नियंत्रण उपक्रमासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे अधिक गतीने हे काम करणे शक्य होत आहे. नवी मुंबईप्रमाणे हे अभियान इतर ठिकाणीही राबविणे आवश्यक असून प्राणीप्रेमी संघटनांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

नवी मुंबईत हवे स्वतंत्र केंद्रमहानगरपालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्रासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. सद्यस्थितीमध्ये डम्पिंग ग्राऊंडवर तात्पुरत्या स्वरूपात केंद्र उभारले आहे. शेजारीच डम्पिंग ग्राऊंड असल्यामुळे केंद्रातील कर्मचारी व श्वान सर्वांनाच धुळीचा त्रास होत आहे.  दुर्गंधीमुळेही आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज, पाणी व इतर समस्याही भेडसावू लागल्या आहेत. महानगरपालिकेने श्वान नियंत्रण केंद्रासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करावी व नवीन केंद्र उभारण्याची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका