शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

उंदीर मारण्यासाठी २५ हजारांचा भुर्दंड

By admin | Updated: July 4, 2017 07:14 IST

पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही

नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही भार पडू लागला आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाले आहेत. रोज पालिकेच्या तिजोरीतील २५ हजार रुपये यासाठी खर्च झाले असून, वर्षभरामध्ये १ लाख ४३ हजार उंदीर मारल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या नावाखाली प्रत्येक वर्षी १०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला जात आहे; पण प्रत्यक्ष या पैशांचा योग्य वापर होत नाही. आरोग्यावरील खर्च व्यर्थ होऊ लागला आहे. श्वान व मूषक नियंत्रण कार्यक्रमावरील खर्चही असाच पाण्यात जात आहे. २०१५-१६ वर्षामध्ये श्वान निर्बीजीकरणावर तब्बल १ कोटी ३ लाख रुपये खर्च झाले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून फक्त ५१०७ श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वास्तविक शहरातील श्वानांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक वर्षी किमान १२ ते १५ हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होणे आवश्क आहे; पण निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आलेल्या अपयशामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे पालिकेला शक्य झालेले नाही. मूषक नियंत्रण कार्यक्रमाच्या बाबतीमध्येही हाच प्रकार होत आहे. आयुक्तांच्या अधिकारामध्ये डिसेंबरमध्ये तब्बल २४ लाख ६७ हजार रुपयांचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे.पालिकेच्या वार्षिक प्रशासन अहवालामध्ये मूषक नियंत्रणाविषयी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये मूषक नियंत्रणासाठी ४८५२ पिंजऱ्यांचा उपयोग करण्यात आला. वर्षभर ६ लाख २४ हजार ३३९ बिळे धूरीकरण करण्यात आली व तब्बल १ लाख ४३ हजार २५ उंदीर मारण्यात आले आहेत. उंदीर मारणे, पिंजरे खरेदी व धूरीकरणासाठी तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर ३६५ दिवसांमध्ये रोज सरासरी ३९१ उंदीर मारण्यात आले असून, यासाठी रोज २५२९३ रुपये खर्च करण्यात आले आहेत. उंदरांचा उपद्रव वाढला असल्यास तक्रार कोणाकडे करायची. पिंजऱ्याची किंवा धूरीकरणाची आवश्यकता असल्यास कोणाशी संपर्क साधायचा? याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याने उंदरांचा त्रास होत असतानाही नागरिकांना वैयक्तिक खर्च करून उपाययोजना करावी लागत आहे. उंदरांमुळे प्रचंड नुकसानशहरामध्ये उंदरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. झोपडपट्टीसह विकसित नोडमध्येही उंदरांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोसायटी आवारामध्ये उभ्या वाहनांची वायर कुरतडण्याचे प्रकार नियमित घडत आहेत. कार्यालयातील संगणक व इतर साहित्याची नासधूस होत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पालिकेच्या कोणत्या विभागाकडे याविषयी तक्रार करायची व धूरीकरणासह इतर उपाययोजना कोण करते? याविषयी माहिती नागरिकांना नसल्याने नुकसान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.