शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

पनवेल ते रसायनी २५ मिनिटांच्या प्रवासाला खड्ड्यांमुळे लागतो १ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:52 IST

राज्य मार्ग क्रमांक १०५ची दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

वैभव गायकरपनवेल: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा राज्य मार्ग क्रमांक १०५ हा खड्ड्यांमुळे चर्चेत आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल-रसायनी या दोन शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र 

पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. अवजड वाहनांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. तसेच या मार्गालगतच मोठ्या प्रमाणात गावे वसलेली असल्याने येथील रहिवासी या मार्गावरून ये-जा करीत असतात.  २० ते २५ मिनिटांचा कालावधी गाठण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते १ तास लागत असल्याने वाहनचालकांचा वेळ आणि इंधनही वाया जात आहे. रसायनीत असलेल्या आद्योगिक वसाहतीमुळे नोकरदार याच मार्गावरून प्रवास करतात. मनेसेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात जाब विचारण्यासाठी निवेदनही दिले गेले होते. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य संदीप भगत हे मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र केवळ आश्वासने देण्यात येतात. येथील खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. दहा किमीच्या या मार्गावर पथदिवेदेखील नसल्याने अपघातांचा धोका अधिक असतो.

अनेक वेळा तक्रारी करूनदेखील काहीच उपयोग होत नाही. आजवर अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडले आहेत. तरी काहीच उपाययोजना होत नाही. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरती डागडुजी केली जाते. पावसाळ्यात या मार्गावर पुन्हा खड्डे पडतात. वर्षभर याच खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागतो.     - नंदकिशोर माळी , वाहन चालक

नागरिक करतात पर्यायी मार्गाचा वापरकोन-सावळा मार्गाच्या दुरवस्थेमुळे अनके वाहनचालक शेडुंग फाटा येथे टोल भरून पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. रसायनीत असलेल्या पिल्लई महाविद्यालयात मुंबई उपनगरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अशा विद्यार्थ्यांनादेखील या खराब मार्गाचा फटका बसतो. 

महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ पनवेल-रसायनीला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत हा रस्ता आहे. येथे यापूर्वी टोल वसुली होत असे तेव्हा मार्ग सुस्थितीत होता. टोल बंद झाल्यापासून खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर सतत अवजड वाहनांची येजा असते. भविष्यात आणखी वाहनांचा वर्दळ वाढणार आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

कोन-सावळा या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पूरहानी दुरुस्ती अंतर्गत शासनाकडे पाठविला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित निविदा काढून रस्त्याची डागडुजी करण्यात येईल. सलग दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गाची दुरवस्था झाली असून यासंदर्भात प्रस्ताव मंजुरीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.                            - नितीन भोये , उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल