शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

एका आठवड्यात चोवीस कोटी वसूल, महापालिकेची ‘अभय योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:40 IST

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही.

नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना’ सुरू केली आहे. एक आठवड्यात २४ कोटी १८ लक्ष रुपये थकबाकी जमा झाली आहे. मोठ्या थकबाकीदारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीतजास्त मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अभय योजनेच्या कालावधीतही कर भरणा न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही. थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कर भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. अभय योजनेच्या काळात कर भरणा करणारांना दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. मूळ रक्कम व २५ टक्के दंड भरावा लागणार आहे. १ एप्रिल ते २१ डिसेंबरदरम्यान १८७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. अभय योजना सुरू केल्यापासून एक आठवड्यात २४ कोटी १८ लक्ष रुपये कर वसुली झाली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाेले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कर भरणे ही प्रत्येक मालमत्ताकरधारकाची जबाबदारी आहे. थकबाकीदारांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अनेक मोठे थकबाकीदार कर भरणा करीत नाहीत. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे. त्यांच्यावर कारवाई करून कर वसूल करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या. अभय योजना सुरू केल्यापासून नेरूळ एमआयडीसीमधील जी. एस. सेठी अँड सन्स यांनी  ४८  लाख ६६ हजार २७९ रुपये कर भरणा केला आहे. नेरूळ सेक्टर ३८ मधील स्टोन लाईफस्पेस यांनी ३० लाख ३५ हजार ६५० रुपये कर भरणा केला आहे. जास्तीतजास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी  केले आहे. 

मालमत्ता जप्त करणारअभय योजना काळात जे थकबाकीदार कर भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात येणार आहेत. मालमत्ता जप्त करणे व इतर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येकानी कर भरणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर कर भरावा. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका