शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सिडकोच्या तीन प्रकल्पांत २३५४ झाडे होणार बाधित १६१० झाडांची कायमची कत्तल : ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण

By नारायण जाधव | Updated: March 1, 2023 19:18 IST

सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत. सिडकोच्या वृक्ष अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार १६१० झाडांची कायमची कत्तल आणि ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या पाचव्या बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पात खारकोपर येथे पंतप्रधान आवास योजनेची घरे, खारघर ते नेरूळ जलमार्ग आणि खारघर ते विक्रोळीपर्यंतच्या वीजवाहिन्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने सिडकोस मोठा दिलासा मिळाला असून, या तिन्ही प्रकल्पांची कामांना आता लवकरच सुरुवात करणे सोपे होणार आहे.

कोणत्या प्रकल्पात किती झाडांचा जाणार बळी

१ - सिडको खारकोपर सेक्टर १६ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २२,९७३ घरे बांधत आहे. या घरांच्या बांधकाम ज्या भूखंडांवर करण्यात येत आहे, त्याठिकाणी दोन पुरातन दुर्मीळ बांबूंच्या वृक्षांसह एकूण २३३ झाडे बाधित होत आहेत. यापैकी ९६ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार असून, १३७ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे.

२ -खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या ९.६ किलोमीटर लांबीच्या कोस्टलच्या रोडच्या बांधकामात ४४७ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ३०९ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार आहे. तर १३८ झाडांचे पुनर्राेपण करू, असा प्रस्ताव सिडकोने राज्य वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवला होता.

३ : मुंबईतील वीजटंचाई कमी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या खारघर ते विक्रोळीदरम्यानच्या ४०० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव आहे. या वीजवाहिन्यांच्या मार्गात १६७४ डौलदार वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक १२०५ झाडांची कत्तल करण्यात येणार असून, ४६९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.भरपाई म्हणून २८१६० झाडांची नव्याने लागवड

तीन प्रकल्पात होणाऱ्या या वृक्षतोड आणि पुनर्रोपणाच्या बदल्यात सिडकोस २८१६० झाडांची भरपाई म्हणून नव्याने लागवड करण्यास सांगण्यात आले. या सर्व बाधित झाडांचे आयुष्यमान २८१६० वर्षे असल्याने तेवढी झाडे अन्यत्र लावावीत, लागवड करण्यात येणाऱ्या रोपांची उंची ६ फुटांपेक्षा कमी नसावी आणि कत्तल झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत सुयोग्य ठिकाणी करावी, अशा अटी राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने घातल्या आहेत.