शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सिडकोच्या तीन प्रकल्पांत २३५४ झाडे होणार बाधित १६१० झाडांची कायमची कत्तल : ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण

By नारायण जाधव | Updated: March 1, 2023 19:18 IST

सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत. सिडकोच्या वृक्ष अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार १६१० झाडांची कायमची कत्तल आणि ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या पाचव्या बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पात खारकोपर येथे पंतप्रधान आवास योजनेची घरे, खारघर ते नेरूळ जलमार्ग आणि खारघर ते विक्रोळीपर्यंतच्या वीजवाहिन्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने सिडकोस मोठा दिलासा मिळाला असून, या तिन्ही प्रकल्पांची कामांना आता लवकरच सुरुवात करणे सोपे होणार आहे.

कोणत्या प्रकल्पात किती झाडांचा जाणार बळी

१ - सिडको खारकोपर सेक्टर १६ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २२,९७३ घरे बांधत आहे. या घरांच्या बांधकाम ज्या भूखंडांवर करण्यात येत आहे, त्याठिकाणी दोन पुरातन दुर्मीळ बांबूंच्या वृक्षांसह एकूण २३३ झाडे बाधित होत आहेत. यापैकी ९६ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार असून, १३७ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे.

२ -खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या ९.६ किलोमीटर लांबीच्या कोस्टलच्या रोडच्या बांधकामात ४४७ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ३०९ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार आहे. तर १३८ झाडांचे पुनर्राेपण करू, असा प्रस्ताव सिडकोने राज्य वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवला होता.

३ : मुंबईतील वीजटंचाई कमी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या खारघर ते विक्रोळीदरम्यानच्या ४०० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव आहे. या वीजवाहिन्यांच्या मार्गात १६७४ डौलदार वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक १२०५ झाडांची कत्तल करण्यात येणार असून, ४६९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.भरपाई म्हणून २८१६० झाडांची नव्याने लागवड

तीन प्रकल्पात होणाऱ्या या वृक्षतोड आणि पुनर्रोपणाच्या बदल्यात सिडकोस २८१६० झाडांची भरपाई म्हणून नव्याने लागवड करण्यास सांगण्यात आले. या सर्व बाधित झाडांचे आयुष्यमान २८१६० वर्षे असल्याने तेवढी झाडे अन्यत्र लावावीत, लागवड करण्यात येणाऱ्या रोपांची उंची ६ फुटांपेक्षा कमी नसावी आणि कत्तल झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत सुयोग्य ठिकाणी करावी, अशा अटी राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने घातल्या आहेत.