शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सिडकोच्या तीन प्रकल्पांत २३५४ झाडे होणार बाधित १६१० झाडांची कायमची कत्तल : ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण

By नारायण जाधव | Updated: March 1, 2023 19:18 IST

सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत. सिडकोच्या वृक्ष अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार १६१० झाडांची कायमची कत्तल आणि ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या पाचव्या बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पात खारकोपर येथे पंतप्रधान आवास योजनेची घरे, खारघर ते नेरूळ जलमार्ग आणि खारघर ते विक्रोळीपर्यंतच्या वीजवाहिन्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने सिडकोस मोठा दिलासा मिळाला असून, या तिन्ही प्रकल्पांची कामांना आता लवकरच सुरुवात करणे सोपे होणार आहे.

कोणत्या प्रकल्पात किती झाडांचा जाणार बळी

१ - सिडको खारकोपर सेक्टर १६ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २२,९७३ घरे बांधत आहे. या घरांच्या बांधकाम ज्या भूखंडांवर करण्यात येत आहे, त्याठिकाणी दोन पुरातन दुर्मीळ बांबूंच्या वृक्षांसह एकूण २३३ झाडे बाधित होत आहेत. यापैकी ९६ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार असून, १३७ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे.

२ -खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या ९.६ किलोमीटर लांबीच्या कोस्टलच्या रोडच्या बांधकामात ४४७ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ३०९ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार आहे. तर १३८ झाडांचे पुनर्राेपण करू, असा प्रस्ताव सिडकोने राज्य वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवला होता.

३ : मुंबईतील वीजटंचाई कमी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या खारघर ते विक्रोळीदरम्यानच्या ४०० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव आहे. या वीजवाहिन्यांच्या मार्गात १६७४ डौलदार वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक १२०५ झाडांची कत्तल करण्यात येणार असून, ४६९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.भरपाई म्हणून २८१६० झाडांची नव्याने लागवड

तीन प्रकल्पात होणाऱ्या या वृक्षतोड आणि पुनर्रोपणाच्या बदल्यात सिडकोस २८१६० झाडांची भरपाई म्हणून नव्याने लागवड करण्यास सांगण्यात आले. या सर्व बाधित झाडांचे आयुष्यमान २८१६० वर्षे असल्याने तेवढी झाडे अन्यत्र लावावीत, लागवड करण्यात येणाऱ्या रोपांची उंची ६ फुटांपेक्षा कमी नसावी आणि कत्तल झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत सुयोग्य ठिकाणी करावी, अशा अटी राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने घातल्या आहेत.