शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:10 IST

रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे.

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे. नाकाबंदीसाठी कार अडवली असता चालकाने कार सोडून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये १५८ किलो गांजा आढळून आला.घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजमहेंद्र बाळतकर, सहायक निरीक्षक राहुल सोनवणे, नितीन पगार, तुकाराम निंबाळकर यांचे पथक तयार करण्यात आलेले. त्यानुसार सेक्टर ५ व इतर परिसरात सोमवारी पहाटे नाकाबंदी लावण्यात आलेली. त्याठिकाणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या संशयास्पद वाहनांची चौकशी केली जात होती. याचदरम्यान सदर मार्गाने एक स्कोडा कार (एमएच ४३ ए १८२५) त्याठिकाणी आली. परंतु पोलिसांना पाहताच कारमधील व्यक्तींनी कार जागीच सोडून अंधारात पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून देखील ते हाती लागले नाहीत. मात्र नाकाबंदीच्या ठिकाणी ते सोडून गेलेल्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह हा गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता, तो १५८ किलो होता. बाजारभावानुसार त्याची किंमत २३ लाख रुपये असल्याचे सहायक निरीक्षक नितीन पगार यांनी सांगितले. परंतु कार मालक तसेच गांजा घेवून त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.नवी मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. तर या प्रकारावरून रात्रीच्या वेळी महागड्या गाड्यांमधून त्याची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. हा गांजा झोपड्यांमध्ये अथवा नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमार्फत विक्री केला जात असल्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या कारवायांमधून ही बाब समोर आलेली आहे. परंतु सातत्याने कारवाया करून देखील गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नसल्याने शहरातली तरुणाई नशेच्या आहारी जात चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर या गांजाची विक्री होत आहे. तर एपीएमसी, तुर्भेसह अनेक ठिकाणी गांजाची शेती यापूर्वी आढळलेली आहे. परंतु गांजा पुरवणारे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नाहीयेत.