शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२३ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:10 IST

रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे.

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे. नाकाबंदीसाठी कार अडवली असता चालकाने कार सोडून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये १५८ किलो गांजा आढळून आला.घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजमहेंद्र बाळतकर, सहायक निरीक्षक राहुल सोनवणे, नितीन पगार, तुकाराम निंबाळकर यांचे पथक तयार करण्यात आलेले. त्यानुसार सेक्टर ५ व इतर परिसरात सोमवारी पहाटे नाकाबंदी लावण्यात आलेली. त्याठिकाणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या संशयास्पद वाहनांची चौकशी केली जात होती. याचदरम्यान सदर मार्गाने एक स्कोडा कार (एमएच ४३ ए १८२५) त्याठिकाणी आली. परंतु पोलिसांना पाहताच कारमधील व्यक्तींनी कार जागीच सोडून अंधारात पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून देखील ते हाती लागले नाहीत. मात्र नाकाबंदीच्या ठिकाणी ते सोडून गेलेल्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह हा गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता, तो १५८ किलो होता. बाजारभावानुसार त्याची किंमत २३ लाख रुपये असल्याचे सहायक निरीक्षक नितीन पगार यांनी सांगितले. परंतु कार मालक तसेच गांजा घेवून त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.नवी मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. तर या प्रकारावरून रात्रीच्या वेळी महागड्या गाड्यांमधून त्याची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. हा गांजा झोपड्यांमध्ये अथवा नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमार्फत विक्री केला जात असल्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या कारवायांमधून ही बाब समोर आलेली आहे. परंतु सातत्याने कारवाया करून देखील गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नसल्याने शहरातली तरुणाई नशेच्या आहारी जात चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर या गांजाची विक्री होत आहे. तर एपीएमसी, तुर्भेसह अनेक ठिकाणी गांजाची शेती यापूर्वी आढळलेली आहे. परंतु गांजा पुरवणारे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नाहीयेत.