शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

२१ गावांपुढे पाणीटंचाईचा प्रश्न

By admin | Updated: February 4, 2016 02:40 IST

शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

महाड : शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. दीड वर्षापूर्वी या धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याच्या कामाला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने महाड शहरासह २१ गावांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवाय या धरणाला पडलेल्या भगदाडामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. महाड रायगड मार्गालगत १९७४ मध्ये कोथुर्डे येथील नदीवर हे पाटबंधारे विभागामार्फत बंधाराकम धरण बांधण्यात आले होते. या धरणातील पाण्यावर महाड शहरासह रायगड मार्गावरील अनेक गावांच्या नळपाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. फेबु्रवारी महिन्यानंतर परिसरातील वाहणाऱ्या गांधारी नदीमध्ये या धरणाचे पाणी सोडले जाते व या नदीच्या पात्रात असलेल्या जॅकवेलमधून या परिसरातील गावांची तहान भागवली जात आहे. जुलै २०१४ मध्ये पावसाळ्यात या धरणाच्या भिंतीला २० फूट खोल खड्डा पडून भिंतीचा भाग खचला होता. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती केली तरी भगदाडातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. या धरणाल धोका निर्माण होऊ नये म्हणून धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असून, तो पाटबंधारे विभागात मंजुरीसाठी प्रलंबित आहे.धरणाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ९६ लाख इतका खर्च अपेक्षित असून, मुख्य विमोचन विहीर जलवाहिनी दुरुस्ती व अश्वपटल मातीकाम आदी कामे केली जाणार आहेत. २०१४ मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काम करण्यासाठी धरणातील पाणी सोडल्यास पाणीटंचाई निर्माण झाली असती. त्यामुळे धरणातील पाणी न सोडताच धरणाची दुरुस्ती करण्याबाबत पाटबंधारे विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याने हे काम रखडल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)