शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

२१ गावांपुढे पाणीटंचाईचा प्रश्न

By admin | Updated: February 4, 2016 02:40 IST

शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.

महाड : शहरासह परिसरातील २१ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे या धरणाला गळती लागली आहे. यामुळे धरणातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. दीड वर्षापूर्वी या धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याच्या कामाला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने महाड शहरासह २१ गावांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवाय या धरणाला पडलेल्या भगदाडामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. महाड रायगड मार्गालगत १९७४ मध्ये कोथुर्डे येथील नदीवर हे पाटबंधारे विभागामार्फत बंधाराकम धरण बांधण्यात आले होते. या धरणातील पाण्यावर महाड शहरासह रायगड मार्गावरील अनेक गावांच्या नळपाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. फेबु्रवारी महिन्यानंतर परिसरातील वाहणाऱ्या गांधारी नदीमध्ये या धरणाचे पाणी सोडले जाते व या नदीच्या पात्रात असलेल्या जॅकवेलमधून या परिसरातील गावांची तहान भागवली जात आहे. जुलै २०१४ मध्ये पावसाळ्यात या धरणाच्या भिंतीला २० फूट खोल खड्डा पडून भिंतीचा भाग खचला होता. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती केली तरी भगदाडातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. या धरणाल धोका निर्माण होऊ नये म्हणून धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला असून, तो पाटबंधारे विभागात मंजुरीसाठी प्रलंबित आहे.धरणाच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ९६ लाख इतका खर्च अपेक्षित असून, मुख्य विमोचन विहीर जलवाहिनी दुरुस्ती व अश्वपटल मातीकाम आदी कामे केली जाणार आहेत. २०१४ मेपर्यंत हे काम पूर्ण केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काम करण्यासाठी धरणातील पाणी सोडल्यास पाणीटंचाई निर्माण झाली असती. त्यामुळे धरणातील पाणी न सोडताच धरणाची दुरुस्ती करण्याबाबत पाटबंधारे विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नसल्याने हे काम रखडल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)