शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खाडीकिनाऱ्यावर ४ वर्षांत २०० स्वच्छता मोहिमा

By नामदेव मोरे | Updated: June 16, 2024 18:20 IST

६०० टन कचरा संकलित : पर्यावरण रक्षणासाठी ६० हजार नागरिकांनी दिले योगदान

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खाडीकिनारा स्वच्छ करण्यासाठी २०२० मध्ये सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने नॉनस्टॉप २०० आठवड्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. नवी मुंबईत सुरू झालेली ही चळवळ मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत पोहोचली असून प्रत्येक रविवारी शेकडो पर्यावरणप्रेमी या अभियानात सहभागी होत आहेत. आतापर्यंत ६० हजार स्वयंसेवकांनी पर्यावरणरक्षणासाठी योगदान दिले आहे. खाडीतून ६०० टन कचरा काढण्यात यश आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील अनेक शहरांमधील कचरा नैसर्गिक नाल्यांमधून समुद्रात टाकला जातो. यामध्ये प्लास्टिकसह विघटन न होणाऱ्या विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश असतो. समुद्र हा कचरा भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्याकडे ढकलतो. किनाऱ्यावर या कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. कोरोना काळात २०२० मध्ये एन्व्हायर्मेंट लाईफ फाउडेशनचे धर्मेश बराई नेरूळमधील टी एस चाणक्यच्या किनाऱ्यावर भटकंतीसाठी गेले असताना तेथील कचरा पाहून व्यथित झाले. स्वत:सह एकूण तीन सहकाऱ्यांनी रविवारी या परिसरात पहिले स्वच्छता अभियान राबविले. या अभियानाची माहिती समाज माध्यमांवर टाकण्यात आली. यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते ९ असे दोन तास खाडीकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी योगदान देण्याचा निश्चय केला. तेव्हापासून सलग चार वर्षे हे अभियान सुरूच आहे.

या रविवारी सारसोळे जेट्टी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा हा २०० वा आठवडा होता. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील विविध खाडीकिनारी हे अभियान नियमित राबविले जात आहे. एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनच्या मँग्रोव्हज सोल्जर विभागाच्या माध्यमातून हे अभियान आता राबविले जाते. मँग्रोव्हज फाउंडेशन व नवी मुंबई महानगरपालिकेचेही त्यासाठी योगदान लाभत आहे. शहरातील विविध पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थीही खाडीकिनारा स्वच्छ करण्याच्या अभियानात सहभागी होत आहेत. नवी मुंबईसोबत मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यामध्येही ही चळवळ पसरली आहे.२०० मोहिमेत यांचा सहभाग

सारसोळे जेट्टी परिसरातील २०० व्या अभियानामध्ये वनशक्ती, बीच प्लीज, स्वच्छ वसुंधरा अभियान व मँग्रोव्हज सोल्जरचे स्वयंसेवक व महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, नेरूळचे विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, दिनेश वाघुळदे, एन्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेश बराई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० मी मोहीम पार पडली.चार वर्षांमध्ये सलग २०० आठवडे हे अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत चप्पल, थर्माकाॅल, मेडिकल वेस्ट, सौंदर्य प्रसाधनाचा कचरा, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पेन, लायटर्स अशा एकूण ६०० टन कचरा संकलित केला आहे. प्रत्येक मोहिमेमध्ये ५० ते २ हजार नागरिक सहभागी होतात. आतापर्यंत ६० हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. धर्मेश बराई, संस्थापक एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशन

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई