शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अलिबागमधील २० महिलांनी अनुभवली आनंदवारी

By admin | Updated: June 23, 2017 06:02 IST

मुखात विठुरायाचे नाम आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर, पायाला पंढरीच्या ओढीची भिंगरी, अशा रूपात विठ्ठलमय झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : मुखात विठुरायाचे नाम आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर, पायाला पंढरीच्या ओढीची भिंगरी, अशा रूपात विठ्ठलमय झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते. कोणी हरिपाठाचे वाचन करत होते, तर कोणी फुगडी खेळत, टाळ, मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन होऊन पुढे जात होते. नाही भुकेची आस, नाही घशाला कोरड अशा अवस्थेत पुणे ते सासवड रस्ता भक्तिमय रंगात एक होऊन रंगून गेला होता आणि याच वारीत अलिबागमधील २० भगिनी सहभागी झाल्या होत्या.पुणे ते सासवड अंतर ३२ किमी आणि पुढे माउलीचे मुक्काम ठिकाण १० किमी असे ४२ किमी अंतर आहे. पालखी काळातला सर्वात मोठा टप्पा तेही दिवसभर चालून सासवड मुक्कामी पोहचायचे अशा हेतूने कितीतरी दिंड्या निघाल्या होत्या. आम्ही पण मागील वर्षी आळंदी ते पुणे एक टप्पा पूर्ण करून, या दुसऱ्या टप्प्यात यंदा वानवडी-हडपसरमार्गे सकाळी साडेआठला चालायला सुरुवात केल्याचे या वारीत सहभागी कवयित्री अनिता जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिकडेतिकडे माउलींच्या नामाचा जयघोष करीत निघालेले वारकरी आणि असंख्य भाविक दिसत होते. काही वेळानंतर आम्हाला पालखीचे दर्शन झाले. पालखीपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली होती. आम्ही २० जणी पालखीमागोमाग निघालो. माउलीच चालण्याचे बळ देत होती, असे जोशी यांनी पुढे सांगितले.दिवे घाटातून वारकरी जाताना मुंग्यांप्रमाणे दिसत होते, म्हणूनच बहुदा या घाटाला मुंगी घाट म्हणत असावेत. रस्त्याबरोबरच डोंगरही माणसांनी फुलून गेला होता. पालखी विश्रांतीसाठी थांबली असता माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवल्याचे भावना जोशी यांनी सांगितले. वारीचा दुसऱ्या वर्षीचा टप्पा यशस्वी पार पडला. कवयित्री अनिता जोशी यांच्या समवेतच्या माधुरी जोशी, शुभांगी नाखे, उमा देशमुख, विद्या महाडेश्वर, राजश्री थळे, भारती वझे, स्मिता जोशी, स्मिता गोडबोले, वर्षा कुलकर्णी, स्वाती पित्रे, अ‍ॅड.स्वाती कुलकर्णी ,विदुला दातार, चित्रा लोंढे, कांचन पाटील, योगिता गवळे, मुग्धा मांजरेकर,अंजू दामले, प्रज्ञा जैन, राधिका खवासखान, नेहा रानडे, दीपा संत, रश्मी देव आणि ऋता मुळ्ये या सर्व २० भगिनी वारीत सहभागी झाल्या होत्या.