शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

नरेगाच्या कामांवर २,९१७ मजूर

By admin | Updated: October 1, 2015 01:43 IST

पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत

ठाणे: पावसाअभावी जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे बहुतांशी गावपाड्यातील ग्रामीण मजूर नरेगाच्या कामावर जात आहेत. त्यासाठी घेतलेल्या ११० कामांवर दोन हजार ९१७ मजूर काम करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला आहे. उत्पादन अत्यल्प होणार असल्यामुळे शेतकरी त्यावर अधिक खर्च करण्यास धजावत नाही. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे ते ग्रामपंचायतींसह विविध शासकीय विभागाद्वारे नरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांवर जात आहेत. एप्रिलपासून या कामांवरील मजुरीतही वाढ झाली आहे. या आधी केवळ १६५ रूपये मिळत असत. परंतु, आता १८१ रूपये प्रतिदिन अशी मजुरी मिळत आहे. त्यामुळे या कामांवर मजूर वळताना दिसत आहेत.या कामांवर हजर राहणाऱ्या मजुरांचे वेतन १५ दिवसाच्या आत त्यांच्या बँकेसह पोस्टातील खात्यावर जमा होत असल्याचा दावाही केला जात आहे. संबंधितानाकडून काही वेळा चुकीचा खातेक्रमांक टाकल्या जात असल्याची समस्या निदर्शनात आलेल्या आहेत. यामुळे दुसऱ्याच्या खात्यावर मजुरी जमा होत असल्याचे तक्रारी अधूनमधून येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन सदरची मजुरी पुन्हा संबंधित मजुराच्या खात्यावर वळविली जाते. या प्रक्रियेला मात्र काही दिवसांचा विलंब होतो.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींद्वारे ६२ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर एक हजार ५८२ मजूर कार्यरत आहेत. याशिवाय विविध यंत्रणाव्दारे ४८ कामे सुरू केलेली आहेत. त्यावर एक हजार ३३५ मजूर कार्यरत आहेत. यापैकी भिवंडी तालुक्यातील २० कामांवर ३०० मजूर आहेत, शहापूर ३८ कामे ११२८ मजूर असून कल्याणमध्ये सात कामांवर १११,अंबरनाथच्या सात कामांवर १६८, मुरबाडच्या ३८ कामांवर सर्वाधिक एक हजार २१० मजूर कार्यरत आहेत.