शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

निवडणूक खर्चाकरिता पुणे, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना १५ कोटींचे अधिकार

By नारायण जाधव | Updated: April 6, 2024 19:16 IST

ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगर आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आकस्मिक खर्च भागविण्याची मर्यादा आता १५ कोटीपर्यंत वाढविली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या अधिकारांवरही अनेक मर्यादा आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या बंधनामुळे आपत्कालीन परिस्थितीतही आयोगाची परवानगी घेऊनच रीतसर निर्णय घ्यावे लागतात. अशातच अनेकदा मोठा निवडणूक खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. यावर सामान्य प्रशासन विभागाने तोडगा काढला असून, मोठ्या प्रमाणात नागरीकरण असलेल्या ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगर आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आकस्मिक खर्च भागविण्याची मर्यादा आता १५ कोटीपर्यंत वाढविली आहे.

ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आणि जास्त लोकसभा मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यांत आकस्मिक खर्चाची मर्यादा वाढविल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याशिवाय मुंबई शहर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आकस्मिक खर्चाचे अधिकार १० कोटीपर्यंत वाढविले आहेत. तर उर्वरित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाच कोटींपर्यंतचे अधिकार दिले आहेत. त्या त्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ आणि त्यात मोडणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या संख्येनुसार ही अधिकार मर्यादा वाढविली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई