शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

निवडणूक खर्चाकरिता पुणे, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना १५ कोटींचे अधिकार

By नारायण जाधव | Updated: April 6, 2024 19:16 IST

ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगर आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आकस्मिक खर्च भागविण्याची मर्यादा आता १५ कोटीपर्यंत वाढविली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या अधिकारांवरही अनेक मर्यादा आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या बंधनामुळे आपत्कालीन परिस्थितीतही आयोगाची परवानगी घेऊनच रीतसर निर्णय घ्यावे लागतात. अशातच अनेकदा मोठा निवडणूक खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. यावर सामान्य प्रशासन विभागाने तोडगा काढला असून, मोठ्या प्रमाणात नागरीकरण असलेल्या ठाणे जिल्ह्यासह मुंबई उपनगर आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आकस्मिक खर्च भागविण्याची मर्यादा आता १५ कोटीपर्यंत वाढविली आहे.

ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आणि जास्त लोकसभा मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यांत आकस्मिक खर्चाची मर्यादा वाढविल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याशिवाय मुंबई शहर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आकस्मिक खर्चाचे अधिकार १० कोटीपर्यंत वाढविले आहेत. तर उर्वरित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाच कोटींपर्यंतचे अधिकार दिले आहेत. त्या त्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ आणि त्यात मोडणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या संख्येनुसार ही अधिकार मर्यादा वाढविली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई