शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

१४ हजार इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नाही; दहा हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 23:43 IST

नवी मुंबईत सिडकोसह महानगरपालिकेचे दुर्लक्ष

नामदेव मोरेनवी मुंबई : महाडमधील इमारत दुर्घटनेनंतर राज्यभरातील इमारतींच्या बांधकामांचा व अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईमध्येही दहा हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे आहेत. तर, तब्बल १४ हजारपेक्षा जास्त इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच नाही. सिडको व महानगरपालिकेचे अधिकारीही अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करीत असून एखादी इमारत कोसळली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश केला जातो. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्येही देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. परंतु महापालिका, सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील काही वर्षांमध्ये अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीमध्ये दहा हजारपेक्षा जास्त ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. काही ठिकाणी संपूर्ण इमारत बेकायदेशीर तर, काही ठिकाणी इमारतीमध्ये अतिक्रमण केलेले आहे. सिडकोसह, एमआयडीसीचे शेकडो भूखंड गिळंकृत केले आहेत. अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने व ठोस कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमणांचा आकडा वाढत आहे. तर, बैठ्या चाळींमधील घरांची पुनर्बांधणी करताना अतिक्रमण होत आहे. १० वर्षांमध्ये या चाळींमधील घरांसाठी बांधकाम परवानगी घेतलेल्या ९० टक्के नागरिकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतले नाही. दोन वर्षांपासून पालिकेने परवानगी दिलेली नसतानाही बिनधास्त अनधिकृत वाढीव बांधकाम केले जात आहे.

कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ, ऐरोली परिसरामध्ये बैठ्या चाळींच्या जागेवर ३ ते ५ मजल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. माथाडी वसाहतींना व अल्प उत्पन्न गटातील घरांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. याशिवाय सिडकोच्या भूखंडांवरही परवानगी न घेता इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. एक मजल्याची परवानगी घेऊन प्रत्यक्षात चार मजल्यांचे बांधकाम केले आहे. यामुळे भविष्यात ही बांधकामे कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.कारवाई केलेल्या जागेवर पुन्हा इमारतीमागील १० वर्षांमध्ये नेरूळ, सानपाडा, वाशी नोड ते ऐरोलीदरम्यान अनेक इमारतींवर अर्धवट कारवाई केली गेली. या वेळी इमारतीच्या स्लॅबला होल पाडणे, पिलर्स जेसीबीने हलवून अतिक्रमण कारवाई झाल्याचा दिखावा केला जातो. अर्धवट बांधकाम पाडलेल्या ठिकाणी काही दिवसांमध्ये पुन्हा इमारतींचे बांधकाम केले आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई नाहीमहानगरपालिका व सिडकोचे अधिकारी संबंधितांना नोटीस देतात. काही ठिकाणी कारवाई केल्याचे भासविले जाते. परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण पूर्णपणे पाडलेही जात नाही व थांबविलेही जात नाही. अतिक्रमण प्रकरणी त्या विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. परंतु कारवाई करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाcidcoसिडको