शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात १४ सेवा दवाखाने, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय  

By नारायण जाधव | Updated: September 19, 2022 17:04 IST

तिन्ही जिल्ह्यांत जागांचा शोध सुरू.

नवी मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात १४ ठिकाणी सेवा दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाने तिन्ही जिल्ह्यात या सेवा दवाखान्यांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत जागामालकांकडून महामंडळाने प्रस्ताव मागविले आहेत.

महामंडळाच्या जूनमध्ये झालेल्या १८८ व्या बैठकीत देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे ही सहा रुग्णालये उभारणार असल्याचे सांगितले होते. याच बैठकीत महाराष्ट्र राज्यात ४८ ठिकाणी दवाखानेही सुरू करण्याचेही घोषित केले होते. त्यात १४ दवाखाने ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यातील आहेत. या दवाखान्यात विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना निवासस्थानाच्या जवळच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

या ठिकाणी सुरू करणार सेवा दवाखानेरबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ, सरावली, डाेंबिवली, वसई, खारघर, पेण, तळोजा, रोहा, न्हावा-शेवा, उरण आणि खालापूर अशी ती १४ ठिकाणे आहेत. यातील सात दवाखाने नवी मुंबई-उरण परिसरातील आहेत.प्रत्येकी १६०० चौरस फूट जागेचा शोधयातील प्रत्येक दवाखान्यासाठी १६०० चौरस फूट जागेचा शोध महामंडळाने सुरू केला आहे. याठिकाणी प्रत्येकी दोन डॉक्टर राहणार आहेत. तळमजल्यावरील जागेवरील प्राधान्य देणार असून जागामालकासोबत किमान तीन वर्षांचा करारनामा करण्यात येणार आहे.कामगारांना मोठा दिलासा१ महामुंबई परिसरात राज्य कामगार विमा योजनेची वरळी, कांदिवली, मुलुंड, ठाणे, उल्हासनगर आणि वाशी येथे रुग्णालये आहेत. मात्र, आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या परिसरातच हे सेवा दवाखाने सुरू होणार आहेत. यामुळे कामाच्या ठिकाणीच तेथील कामगारांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहेत. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ये-जा करण्याचा त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा यात बचत होणार आहे.२ ज्या भागात ईएसआय योजना अंशत: अंमलात आणली आहे किंवा अंमलात आणली जाणार आहे किंवा जेथे ईएसआयसीच्या विद्यमान आरोग्यसुविधा मर्यादित आहेत अशा सर्व भागातील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नीकृत रुग्णालयांद्वारे रोकड विरहित (कॅशलेस )वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णयही यापूर्वीच झाला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNavi Mumbaiनवी मुंबई