शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नऊ महिन्यात आढळले १३४ बेवारस मृतदेह; बेघरांचा सर्वाधिक समावेश 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 27, 2023 17:32 IST

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते २६ ऑक्टोबर दरम्यान १३४ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत.

नवी मुंबई : शहरात बेवारस मृतदेह आढळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यापैकी बहुतांश व्यक्ती बेघर असल्याने पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर देखील त्यांची ओळख पटत नाही. चालू वर्षात नऊ महिन्यात नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १३४ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. तर गतवर्षी १५९ बेवारस मृतदेह आढळून आले होते. 

नवी मुंबईत घडणारे गुन्हे उघडकीस आणणे, हैदोस घालणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश लावणे याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढे आहे. त्यातच बेवारस मृतदेहांच्या तपासाची भर पडत आहे. अनेकदा बेवारसपणे आढळून येणाऱ्या मृतदेहांमागे गुन्हेगारी कृत्यांचा देखील संदर्भ असू शकतो. त्यामुळे प्रत्येक बेवारस मृतदेहाचा तपास पोलिसांकडून गांभीर्याने केला जातो. त्यात नैसर्गिक किंवा अपघाती मृत पावणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. परंतु नवी मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये चौकशी करूनही अनेकांची ओळख पटत नाही. त्यावरून या व्यक्ती बेघर, भिकारी असल्याचे स्पष्ट होते. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात आढळून येणाऱ्या बेवारस मृतदेहांमध्ये देखील बेघरांचे प्रमाण अधिक आहे. पुलांखालील जागेत, पदपथांवर तसेच इतर आडोशाच्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. मात्र या व्यक्ती शहरात येतात कुठून याचा प्रशासनाला अद्याप प्रश्न पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बेघरांच्या वस्त्या देखील तयार झाल्या आहेत. त्यातच आजाराणे ग्रासल्याने उपचार अभावी देखील अनेकजण मृत पावत आहेत. काही दिवसांपूर्वीच जुईनगर येथील आरोग्य केंद्राबाहेर देखील एक बेघर व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली होती. 

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते २६ ऑक्टोबर दरम्यान १३४ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. तर गतवर्षी १५९ बेवारस मृतदेह आढळून आले होते. बेवारस मृतदेह आढळून आल्यानंतर त्याची ओळख पटेपर्यंत काही दिवस मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवगृहात ठेवला जातो. यामुळे देखील रुग्णालयांच्या शवगृहात मृतदेहांचा खच लागत आहे. तर शोध घेऊनही मृत व्यक्तीची ओळख न पटल्याच कायदेशी विल्हेवाट लावली जाते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत पोलिसांचाही चांगलाच कस निघतो. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू