शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

देशात दरवर्षी ११ हजार मुले बेपत्ता, प्राजक्ता कुलकर्णींनी मांडले वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 06:58 IST

देशातून प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होतात. बाल लैंगिक अत्याचारामध्ये जगात पहिला व महिला अत्याचारामध्ये चौथ्या क्रमांकावर येत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : देशातून प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होतात. बाल लैंगिक अत्याचारामध्ये जगात पहिला व महिला अत्याचारामध्ये चौथ्या क्रमांकावर येत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सतीश हावरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगरमधील स्रेहालय संस्थेच्या डॉ. गिरीश कुलकर्णी व प्राजक्ता कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राजक्ता यांनी लैंगिक अत्याचाराविषयीच्या भयाण वास्तवावर लक्ष वेधले. देशात बलात्काराची घटना झाली की मोर्चे काढले जातात. पीडित मृत तरूणीला श्रद्धांजली अर्पण केली जाते. काही दिवसांनी सर्व शांत होते. परंतु पीडित मुलीच्या पालकांच्या मनावरील जखमा कधीच भरून निघत नाहीत. प्रत्येक वर्षी ११ हजार मुले बेपत्ता होत आहेत. बाललैंगिक व महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अत्याचाराच्या वाढणाऱ्या घटना पाहिल्या की समाजाचा सुसंस्कृतपणा तपासून पाहण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गिरीश कुलकर्णी यांनी स्रेहालयच्या वाटचालीविषयी माहिती दिली. प्रत्येकाने बदलाची सुरवात स्वत:पासून करावी. समाजात संस्काराची कमी असून ती भरून काढली पाहिजे. तरूणांना प्रेरणा देवून चांगल्या कार्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दुसºयांसाठी जगता आले पाहिजे असे मत व्यक्त केले. कॅम्लीनचे सुभाष दांडेकर यांनीही स्रेहालयच्या व हावरे परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमास शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, संजय हावरे, प्रवीण हावरे, उज्ज्वला हावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.स्नेहालयचा आदर्शसतीश हावरे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त स्रेहालयच्या कुलकर्णी दाम्पत्याला जीवनगौरव पुरस्कार, स्मृतिचिन्ह व १ लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली. स्रेहालय अहमदनगरमध्ये ३० वर्षांपासून देहविक्रय करणाºया महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहे. स्रेहांकुर दत्तक विधान केंद्राच्या माध्यमातून ७३० बालके विविध कुटुंबामध्ये पुनर्वसित झाली आहेत. ४१७ कुमारी माता, बलात्कारित महिलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. स्रेहाधार प्रकल्पाच्या माध्यमातून २२ हजार महिलांना सहकार्य केले आहे. स्रेहज्योत योजनेअंतर्गत ३४०० महिलांना लाभ देण्यात आला आहे. मुक्तीवाहिनी पथकाच्या माध्यमातून २०० प्रकरणात आरोपींना शिक्षा दिली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा