शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

48 जागांसाठी 110 उमेदवार रिंगणात

By admin | Updated: November 13, 2014 22:47 IST

कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या 59 जागांसाठी 23 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे.

कर्जत : कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या 59 जागांसाठी 23 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी  59 जागांसाठी दाखल नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 48 जागांसाठी 110   उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, चार ग्रामपंचायतीमधील अकरा जागा तेथे एकमेव उमेदवार राहिल्याने त्या 11  जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई तर्फे नीड या पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 210  उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यातील सात नामांकन अर्ज छाननी प्रक्रि येत बाद ठरले होते. त्यामुळे 203  वैध  नामांकन अर्जापैकी आज नामांकन मागे घेण्याच्या दिवशी तब्बल 82 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेऊन माघार घेतली. नेरळ ग्रामपंचायतीमधील 29 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 17 जागांसाठी आता 56  उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहे.
तेरा जागांसाठी निवडणूक होत असलेल्या उमरोली ग्रामपंचायतीमध्ये 23 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे  आता तेथे 10 जागांसाठी 22  उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तेथील प्रभाग दोनमधील एक आणि प्रभाग पाचमध्ये एकही अर्ज नसल्याने तेथे दोन जागांसाठी मतदान होणार नाही. 
उमरोली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. नऊ सदस्य निवडीसाठी निवडणूक होत असलेल्या तिवरे ग्रामपंचायतीमध्ये दाखल झालेल्या  अर्जापैकी 27  उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. तेथील प्रभाग एकमधील दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव चित्ना जगदीश ठाकरे आणि सर्वसाधारण महिला राखीव जागेवर जना मुकुंद पवार असे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी दाखल अर्जापैकी 8 उमेदवारांनी  अर्ज मागे घेतले. त्यात प्रभाग एकमध्ये अर्चना राजेंद्र दुर्गे (सर्वसाधारण महिला), कविता सुनील दुर्गे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या तर तीनमध्ये शेवंता हरी मिरकुटे (अनुसूचित जमाती महिला) जागेवर बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग चारमध्ये अनंत हल्या दळवी (सर्वसाधारण) व जागृती जयदास दळवी ( सर्वसाधारण) हे पाच उमदवार बिनविरोध निवडून आले. याठिकाणी सहा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 
 
वरई तर्फे नीड ग्रामपंचायतीमध्ये दाखल 25  पैकी 13  उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे  9 पैकी तब्बल सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.आता केवल 6 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथे प्रभाग दोनमध्ये यशोदा चंदर मोडक (सर्वसाधारण), किशोर गणू मोडक (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), अनिता अनिल धुळे (सर्वसाधारण महिला)हे तीन तसेच प्रभाग तीनमधील करु णा दीपक भुसारी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), जितेन्द्र रघुनाथ देशमुख (सर्वसाधारण), फशी सखाराम वाघमारे (अनुसूचित जमाती महिला) हे बिनविरोध निवडून आले आहेत.