शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ब्लास्टिंगमुळे १०० घरांना तडे! नवी मुंबई विमानतळासाठी काम, आंदोलनाचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 06:36 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत.

मधुकर ठाकूर उरण :

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोअर ब्लास्टिंगमुळे भूकंपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बोअर ब्लास्टिंग बंद न केल्यास विमानतळाचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोला दिला आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सपाटीकरणाचे जोरदार काम सुरू आहे. डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोअर ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. यासाठी विमानतळाचे काम करणाऱ्या ठेकेदार  कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र, दररोज दुपारच्या वेळी बोअर ब्लास्टिंग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक     स्फोटकांच्या प्रमाणाचा वापर ठेकेदार कंपनीकडून केला जात आहे.

दररोज ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील सर्वच रहिवाशांच्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसू लागले आहेत. एखाद्या भूकंपाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे  ३०० घरांपैकी सुमारे १०० घरांना तडे गेल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत यांनी दिली. वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. घरातील तीनही भिंतीना तडे गेले असल्याने सातत्याने जीव मुठीत धरूनच घरात राहावे लागत आहे. मात्र, भीतीमुळे लहान मुलांना दुसऱ्या घरी पाठविले असल्याची माहिती दापोळकर यांनी दिली.

आशाबाई दापोळकर या विधवेच्या घरातील घर, जिना, लाद्या, सिलिंगला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. आर्थिक ओढाताण करून बांधलेल्या एकमेव घरात दोन मुलांसह राहते. 

दररोज मोठ्या प्रमाणावरील ब्लास्टिंगमुळे वित्त, जीवितहानी होण्याच्या भीतीने घरात नाईलाजाने वास्तव्य करून राहात असल्याची खंतही आशाबाईंनी व्यक्त केली. 

‘अधिकाऱ्यांनी पाहणी करावी’नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाच्या कामासाठी सुरू असलेल्या बोअर ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे बसत आहेत. अनेक घरांना तडेही गेले आहेत. यामुळे वित्त व जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून बोअर ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा विमानतळाचे कामकाज बंद करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला असल्याची माहिती वहाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा पाटील यांनी दिली.

ही बाब गंभीर असल्याने या बोअर ब्लास्टिंगची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत. - राहुल मुंडके, प्रांताधिकारी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई