शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

घोषणा अन् अवहेलना; महाराष्ट्र भवनसाठी १०० कोटी तरतूद पण एक वीटही रचली नाही

By नारायण जाधव | Updated: December 5, 2022 07:25 IST

आधी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन बांधा, नंतर युपीतील महाराष्ट्र सदन किंवा आसाममधील महाराष्ट्र भवनाचे बघा, असा सूर आता उमटत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या आसाम दौऱ्यात नवी मुंबईत आसाम भवन, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, नवी मुंबईत वाशी रेल्वे स्टेशनसमोर यापूर्वीच आसाम भवन उभे आहे, तर महाराष्ट्र भवन मात्र घोषणांच्या गर्तेत गटांगळ्या खात आहे. 

नवी मुंबई शहराची उभारणी करताना या शहराच्या जन्मदात्या सिडकोने देशातील विविध प्रांतातील लोक येथे यावेत, या उद्देशाने १९९२ मध्ये वाशी येथील सेक्टर-३० मध्ये विविध राज्यांच्या सरकारांना त्यांच्या राज्य अतिथिगृहांसाठी भूखंड वाटपाचे धोरण तयार केले होते. त्यानुसार आतापर्यंत आसाम, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, मिझोराम, मेघालय, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांना भूखंडांचे वाटप केले आहे. यात आसाम सरकारने सर्वांत आधी २००७ मध्ये आपले राज्य अतिथी भवन उभे केले आहे. सध्या याठिकाणी आसाममधील विविध रुग्ण, अतिथी राहण्यास असतात. शिवाय येथील हॉल विविध कार्यक्रम, एक्झिबिशनसाठी देण्यात येतो. 

सिक्कीम आणि त्रिपुरा सरकारच्या विनंतीनुसार खारघर सेक्टर-१६ मधील भूखंड क्र. १९ आणि २० आणि भूखंड क्र. १८ अनुक्रमे सिक्कीम आणि त्रिपुरा सरकारच्या राज्य अतिथिगृह/ विक्रयालयाच्या उभारणीसाठी देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी वाशीत दिलेल्या भूखंडावर महाराष्ट्र शासनाने १९९८ पासून आजपर्यंत महाराष्ट्र भवनाची वीट रचलेली नाही. मागे तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बांधण्याचा मनोदय व्यक्त केला होता. यामुळे आधी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन बांधा, नंतर युपीतील महाराष्ट्र सदन किंवा आसाममधील महाराष्ट्र भवनाचे बघा, असा सूर आता उमटत आहे. कारण सिडकोने महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी वाशीत १९९८ मध्ये आठ हजार चौरस मीटरचा भूखंड राखीव ठेवला आहे. मात्र, येथे आजतागायत साधा पायाही खणला गेलेला नाही. देशातील राज्यांनी आपली स्वतंत्र ओळख सांगण्यासाठी वाशी रेल्वे स्थानक परिसरात विविध देखणे अतिथिगृह उभारले आहेत. मात्र, महाराष्ट्र भवन काही होईना. 

महाराष्ट्र भवनाला दिलेल्या १०० कोटींचे काय?मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. यासाठी १०० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीवरून केली होती. परंतु, पुढे संबंधित विभागाने काहीच हालचाल केलेली नाही.