शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:26 IST

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (6 मे) काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व 51 ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. याही टप्प्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तसेच ती नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. या टप्प्यात बंगालमध्ये 74 टक्के, तर अनंतनागमध्ये 3 टक्के मतदान झाले. पुलवामा व शोपिया हा भाग अनंतनाग मतदारसंघात येतो. दहशतवाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडायला तयार नव्हते. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे येतात. मतदारांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. पण दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ 1.8 टक्केच मतदान झाले होते. हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे मतदान तीन टप्प्यांत होत आहे. याआधीच्या दोन टप्प्यांतही तिथे जेमतेम 8 ते 9 टक्के मतदान झाले होते. 

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीमध्ये पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी  सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये इतर दहशतवाद्यांच्या गावातही कोणीही मतदान केले नसल्याची माहिती समोर येत आहे. 

अनंतनाग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह नव्हता. मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन दहशतवाद्यांनी केले होते. समाजकंटकांनी काही ठिकाणी दगडफेक केली, तर एका मतदान केंद्रापाशी ग्रेनेड फेकण्यात आला. त्याच्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. तेथील काही मतदान केंद्रांवर एक ते तीन मतदारांनीच आपला हक्क बजावला. पाचव्या टप्प्यात आतापर्यंत सर्वात कमी 63.5 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 69.50 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले तर दुसऱ्या टप्प्यात 69.44 टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात 68.40 आणि चौथ्या टप्प्यात 65.51 टक्के मतदान झाले.

Lok Sabha Election 2019 : अनंतनाग मतदारसंघामधील मतदान केंद्रे रिकामीपुलवामा व शोपियामध्ये रस्त्यांवर मतदार नसले तरी सुरक्षा दलाचे जवान व वाहने मोठ्या प्रमाणात होती. दहशतवाद्यांच्या भीतीने गावांमधील दुकानेही बंदच होती.काश्मीरमधील पुलवामा व शोपियां या भागांत दहशतवादी सक्रिय असल्याने हा परिणाम दिसत होता. कुपवाडा जिल्ह्यातील काकापोरा या लहान शहरातही हेच दृश्य होते. तिथे एका केंद्रात मतदारांची संख्या 1039 असून, तिथे दोनच जणांनीच दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केले. अनेक मतदान केंद्रांत एक, दोन वा तीनच मतदार दुपारपर्यंत आले होते. लोकांना घाबरवण्यासाठी सोमवारी सकाळीच समाजकंटकांनी काही भागांत दगडफेक सुरू केली होती. अनेक घरांच्या काचा फुटल्या त्यामुळे लोक बाहेरच पडले नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकanantnag-pcअनंतनागterroristदहशतवादीVotingमतदानJammu Kashmirजम्मू-काश्मीर