शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Lok Sabha Election 2019 : दहशतवादी बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 11:26 IST

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (6 मे) काश्मीरमधील अनंतनाग व पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघातील हिंसाचार वगळता सर्व 51 ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. याही टप्प्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तसेच ती नीट चालत नसल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. या टप्प्यात बंगालमध्ये 74 टक्के, तर अनंतनागमध्ये 3 टक्के मतदान झाले. पुलवामा व शोपिया हा भाग अनंतनाग मतदारसंघात येतो. दहशतवाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडायला तयार नव्हते. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे येतात. मतदारांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. पण दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ 1.8 टक्केच मतदान झाले होते. हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे मतदान तीन टप्प्यांत होत आहे. याआधीच्या दोन टप्प्यांतही तिथे जेमतेम 8 ते 9 टक्के मतदान झाले होते. 

तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीमध्ये पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी  सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये इतर दहशतवाद्यांच्या गावातही कोणीही मतदान केले नसल्याची माहिती समोर येत आहे. 

अनंतनाग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह नव्हता. मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन दहशतवाद्यांनी केले होते. समाजकंटकांनी काही ठिकाणी दगडफेक केली, तर एका मतदान केंद्रापाशी ग्रेनेड फेकण्यात आला. त्याच्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. तेथील काही मतदान केंद्रांवर एक ते तीन मतदारांनीच आपला हक्क बजावला. पाचव्या टप्प्यात आतापर्यंत सर्वात कमी 63.5 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 69.50 टक्के मतदान पहिल्या टप्प्यात झाले तर दुसऱ्या टप्प्यात 69.44 टक्के मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात 68.40 आणि चौथ्या टप्प्यात 65.51 टक्के मतदान झाले.

Lok Sabha Election 2019 : अनंतनाग मतदारसंघामधील मतदान केंद्रे रिकामीपुलवामा व शोपियामध्ये रस्त्यांवर मतदार नसले तरी सुरक्षा दलाचे जवान व वाहने मोठ्या प्रमाणात होती. दहशतवाद्यांच्या भीतीने गावांमधील दुकानेही बंदच होती.काश्मीरमधील पुलवामा व शोपियां या भागांत दहशतवादी सक्रिय असल्याने हा परिणाम दिसत होता. कुपवाडा जिल्ह्यातील काकापोरा या लहान शहरातही हेच दृश्य होते. तिथे एका केंद्रात मतदारांची संख्या 1039 असून, तिथे दोनच जणांनीच दहशतवाद्यांच्या धमकीला न घाबरता मतदान केले. अनेक मतदान केंद्रांत एक, दोन वा तीनच मतदार दुपारपर्यंत आले होते. लोकांना घाबरवण्यासाठी सोमवारी सकाळीच समाजकंटकांनी काही भागांत दगडफेक सुरू केली होती. अनेक घरांच्या काचा फुटल्या त्यामुळे लोक बाहेरच पडले नाहीत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकanantnag-pcअनंतनागterroristदहशतवादीVotingमतदानJammu Kashmirजम्मू-काश्मीर