शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काश्मिरी मुलींना 15 ऑगस्टच्या परेडपासून दूर ठेवा, दहशतवाद्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 17:23 IST

काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जाकिर मुसा नावाच्या दहशतवादी संघटनेनं शाळेत शिकणा-या मुलींवर 15 ऑगस्टच्या दिवशी होणा-या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नका, अशा प्रकारची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे.

श्रीनगर, दि. 9 - काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जाकिर मुसा नावाच्या दहशतवादी संघटनेनं शाळेत शिकणा-या मुलींवर 15 ऑगस्टच्या दिवशी होणा-या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकू नका, अशा प्रकारची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी ही धमकी दिली असून, श्रीनगरमध्ये 15 ऑगस्टला होणा-या परेडपासून मुलींना दूर ठेवा, असा इशाराही दहशतवाद्यांनी पालकांना दिला आहे. जाकिर मुसा मेपर्यंत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. मात्र त्यानंतर त्यानं अल कायदाशी हातमिळवणी केली.  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीत अल कायदाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. मात्र अद्यापही दोन दहशतवादी लपून बसल्याचं समजल्यामुळे परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. तसेच पुलवामा जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी अल कायदाशी संबंधित असून, जाकिर मुसाच्या नेतृत्वात ते सक्रिय होते. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, जाहीद आणि इसहाक अशी त्यांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदानं गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जम बसवण्यासाठी गजवत -ए- हिंद नावाची दहशतवादी संघटना स्थापन केली होती. तसेच मुसाला या भागाचं प्रमुख घोषित केलं होतं. सुरक्षा जवानांना त्रालमधल्या गुलाब बागमध्ये तीन दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तरीत्या या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनी त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तीही पुलवामा जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्तानं येणार होत्या. मात्र ऐन वेळी त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.  काश्मीरमध्ये सध्या लष्कराचं ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. त्यात त्यांनी दहशतवाद्यांची एक यादी बनवली आहे. यादीनुसार दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन राबवून त्यांना कंठस्नान घालण्यात येत आहे. आतापर्यंत 115 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.