शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:35 IST

'आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.'

नवी दिल्ली : आपल्या मागण्यांसाठी लढा देताना जनतेने विशेषत: युवकांनी अहिंसक मार्गाचा अवलंब करावा. प्रत्येकाने आपली सामाजिक, आर्थिक उद्दिष्ट्ये घटनात्मक व सनदशीर मार्गांनीच साध्य करावीत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर झालेल्या आंदोलनाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले होते. त्याचा थेट उल्लेख न करता राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना आवाहन केले.

राष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेची देणगी साऱ्या जगाला दिली. कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी गांधीजींनी आचरणात आणलेले तंत्र देशातील लोकशाहीलाही लागू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या दोघांनी देशाचा विकास व जनकल्याणाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीनेच राजकीय मते व्यक्त करावीत.

राष्ट्रपती म्हणाले की, स्वतंत्र लोकशाही देशात असतात ते सारे अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना दिले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या चार तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारीही नागरिकांवर आहे. ही जबाबदारी महात्मा गांधीच्या विचारांची कास धरल्यास नीट पार पाडता येईल. देशाची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत.

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा देशातील ८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. देशातील जम्मू-काश्मीर, लडाखपासून ते ईशान्य भारतातील भागांपर्यंत सर्वच ठिकाणच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. इस्रोने आजवर केलेल्या कामगिरीचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. ते म्हणाले की, गगनयान मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रो अपार मेहनत घेत आहे.तिसरे दशक नवभारताच्या उदयाचेराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, २१व्या शतकातील तिसरे दशक हे नवभारताच्या उदयाचे असेल. नव्या पिढ्या देशाचे भवितव्य घडवतील. आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद