शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:35 IST

'आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.'

नवी दिल्ली : आपल्या मागण्यांसाठी लढा देताना जनतेने विशेषत: युवकांनी अहिंसक मार्गाचा अवलंब करावा. प्रत्येकाने आपली सामाजिक, आर्थिक उद्दिष्ट्ये घटनात्मक व सनदशीर मार्गांनीच साध्य करावीत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर झालेल्या आंदोलनाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले होते. त्याचा थेट उल्लेख न करता राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना आवाहन केले.

राष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेची देणगी साऱ्या जगाला दिली. कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी गांधीजींनी आचरणात आणलेले तंत्र देशातील लोकशाहीलाही लागू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या दोघांनी देशाचा विकास व जनकल्याणाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीनेच राजकीय मते व्यक्त करावीत.

राष्ट्रपती म्हणाले की, स्वतंत्र लोकशाही देशात असतात ते सारे अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना दिले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या चार तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारीही नागरिकांवर आहे. ही जबाबदारी महात्मा गांधीच्या विचारांची कास धरल्यास नीट पार पाडता येईल. देशाची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत.

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा देशातील ८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. देशातील जम्मू-काश्मीर, लडाखपासून ते ईशान्य भारतातील भागांपर्यंत सर्वच ठिकाणच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. इस्रोने आजवर केलेल्या कामगिरीचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. ते म्हणाले की, गगनयान मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रो अपार मेहनत घेत आहे.तिसरे दशक नवभारताच्या उदयाचेराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, २१व्या शतकातील तिसरे दशक हे नवभारताच्या उदयाचे असेल. नव्या पिढ्या देशाचे भवितव्य घडवतील. आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद