शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 06:35 IST

'आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.'

नवी दिल्ली : आपल्या मागण्यांसाठी लढा देताना जनतेने विशेषत: युवकांनी अहिंसक मार्गाचा अवलंब करावा. प्रत्येकाने आपली सामाजिक, आर्थिक उद्दिष्ट्ये घटनात्मक व सनदशीर मार्गांनीच साध्य करावीत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर झालेल्या आंदोलनाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले होते. त्याचा थेट उल्लेख न करता राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना आवाहन केले.

राष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेची देणगी साऱ्या जगाला दिली. कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी गांधीजींनी आचरणात आणलेले तंत्र देशातील लोकशाहीलाही लागू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या दोघांनी देशाचा विकास व जनकल्याणाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीनेच राजकीय मते व्यक्त करावीत.

राष्ट्रपती म्हणाले की, स्वतंत्र लोकशाही देशात असतात ते सारे अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना दिले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या चार तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारीही नागरिकांवर आहे. ही जबाबदारी महात्मा गांधीच्या विचारांची कास धरल्यास नीट पार पाडता येईल. देशाची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत.

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा देशातील ८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. देशातील जम्मू-काश्मीर, लडाखपासून ते ईशान्य भारतातील भागांपर्यंत सर्वच ठिकाणच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. इस्रोने आजवर केलेल्या कामगिरीचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. ते म्हणाले की, गगनयान मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रो अपार मेहनत घेत आहे.तिसरे दशक नवभारताच्या उदयाचेराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, २१व्या शतकातील तिसरे दशक हे नवभारताच्या उदयाचे असेल. नव्या पिढ्या देशाचे भवितव्य घडवतील. आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद