शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

प्रगत राष्ट्राचे दायित्व युवकांनी स्विकारावे - रणजित सावरकर

By admin | Updated: May 11, 2014 19:34 IST

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध आरंभदिनाला उजाळा

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध आरंभदिनाला उजाळा
मुंबई : अनाम वीरांच्या स्मृती कायम ठेवून या हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लावण्यासाठी अखंड हिंदुस्थान व प्रगत राष्ट्र घडवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि युवा वर्गाने हे दायित्त्व स्विकारले पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांनी ठरवलेल्या शिपायाच्या बंडाला स्वातंत्र्यसमर असल्याचे सिद्ध केले, त्या युद्धाचा आरंभ दिन १० मे १८५७ असून त्या निमित्ताने स्मारकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या अभूतपूर्व स्वातंत्र्यलढ्याची रणदुंदुभी मेरठ येथे फुंकली गेली. मंगल पांडे नावाच्या ठिणगीने उठलेल्या या आगीने पाहता पाहता
वणव्याचे रुप धारण केले आणि इंग्रजी राज्य भस्मसात होऊन जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती . ही आग शमवण्यात इंग्रजांना यश आले असले तरी याच आगीतून पुढे क्रांतीचे निखारे फुलले. झाशीची राणी लक्ष्मीबाई , श्रीमंत नानासाहेब पेशवे , बहादूरशहा ज़फर, अवधची बेगम हजरतमल , कुंवरसिंग, रंगो बापूजी आणि सेनापती तात्या टोपे अशी अनेक तेजस्वी ज्वाळा या वणव्यातून उठल्या आणि पुढे अनेक अनाम वीरांनादेशकार्यासाठी प्रेरणास्त्रोत बनून गेल्या यांच्या स्मृती आपण कायम राखल्या पाहिजेत, असे सावरकर म्हणाले. (प्रतिनिधी)
............................
युद्ध ग्रंथाची मूळ प्रत पाहण्यासाठी गर्दी

स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध या ग्रंथाची मूळ प्रत पाहण्यासाठी स्मारकात ठेवण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ग्रंथामुळे स्वातंत्र्य युद्धाची पहिली ठिणगी जगापुढे आली आणि त्यातून अनेक सशस्त्र क्रांतिकारक उदयास आले व त्यांनी आपापल्या परीने भारतमातेला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीरांच्या या संशोधनपर ग्रंथावर ब्रिटिशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी घातली होती. मात्र महाप्रयासाने त्याचे मुद्रण झाले. नंतरच्या काळात ही त्यांनी लिहलेली ही मूळ प्रत स्मारकाकडे आली असून तिचे योग्य प्रकारे संवर्धन करण्यात आले आहे. ही प्रत पहावयास मिळाल्यामुळे स्मारकात येणार्‍यांच्या चेहर्‍यावर एकच आनंद व देशभक्तीची भावना उमटून आली.
..................