शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

२०० किमी चालण्याने तरुण कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 00:31 IST

रणवीर सिंगला तीन लहान मुले असून तीनच वर्षांपूर्वी तो दिल्लीच्या या हॉटेलात नोकरीस होता. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब असून कोरडवाहू शेती आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या तुगलकाबाद भागातील एका हॉटेलमध्ये ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करणाऱ्या रणवीर सिंग नावाच्या ३९ वर्षांच्या कामगाराचा सुमारे २०० किमी चालून आग्रा येथे पोहोचल्यावर शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला.

तो मुळचा मध्य प्रदेशाच्या मोरेना जिल्ह्यातील बदरफा गावातील होता व ‘लॉकडाऊन’मुळे शेकडो किमी चालत मूळ गावी निघालेल्या अन्य हजारो मजूर व कामगारांप्रमाणे तोही घरी जात होता. रणवीर सिंगला तीन लहान मुले असून तीनच वर्षांपूर्वी तो दिल्लीच्या या हॉटेलात नोकरीस होता. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब असून कोरडवाहू शेती आहे.

दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. २ वरून गुरुवारी दुपारी निघालेला रणवीर सिंग सुमारे २०० किमी चालून आग्रा शहरापासून जवळच असलेल्या कैलास मोड येथे पोहोचला व एकदम खाली कोसळला. जवळच्याच एका दुकानदाराने हे पाहिल्यावर त्याने रणवीर सिंगला चटईवर झोपवले व चहा आणि बिस्किट खायला दिले.

छातीतील असह्य वेदनांनी तो विव्हळत होता. तशाही अवस्थेत त्याने मोबाईलवरून गावी आपल्या भावाला फोन केला व आपल्या अवस्थेची त्यास माहिती दिली. पण थोड्याच वेळाने तो बसल्या जागीच गतप्राण झाला, असे सिकंदरा पोलिसांनी सांगितले. उत्तरीय तपासणीत त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले. कदाचित रणवीर सिंगला आधीपासूनच हा आजार असावा व अन्नपाण्याविना उन्हातून एवढे अंतर चालण्याच्या श्रमाने त्याची प्रकृती अचानक ढासळली असावी, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूdelhiदिल्ली