शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

आपमध्ये धुमश्चक्री; आज होणार फैसला

By admin | Updated: March 28, 2015 00:06 IST

केजरीवालांनी अंतर्गत लोकशाहीला तिलांजली देत सत्ता हस्तगत करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचे भवितव्य ठरविण्यासाठी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असतानाच या दोघांनी शुक्रवारी एका पत्रपरिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले करीत पक्षांतर्गत संघर्ष नव्या वळणावर नेऊन ठेवला आहे. केजरीवालांनी अंतर्गत लोकशाहीला तिलांजली देत सत्ता हस्तगत करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. केजरीवाल गटाचा आरोपदिल्ली निवडणुकीत पक्षाचा पराभव व्हावा हाच उद्देश ठेवून भूषण व यादव यांनी कारवाया केल्या. आपमधून बाहेर पडलेल्या एव्हीएएम या गटाशी त्यांनी संबंध ठेवून २ कोटी रुपयांची बनावट देणगी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, याकडे केजरीवाल गटाने लक्ष वेधले. राजीनामा दिलाच नाही? आम्ही पाच मागण्या पूर्ण करण्याबाबत पाठविलेले पत्र हेच आमचे राजीनामापत्र समजले जावे असे स्पष्ट केले होते. सध्या हेच पत्र राजीनामा म्हणून दाखविले जात आहे, असा दावा भूषण व यादव यांनी केला.तुमच्यासोबत काम करण्याऐवजी मी दिल्लीत ६७ आमदारांना घेऊन प्रादेशिक पक्षाची स्थापना करेन, असे केजरीवाल म्हणाले होते. ही कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली? असा सवालही भूषण यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)दीर्घकाळ पक्ष चालवताना मी केजरीवालांच्या दोन कमतरता स्पष्ट केल्या होत्या. केजरीवालांचा निर्णय अंतिम असतो. वेगळा सूर लावणाऱ्यांसोबत ते काम करू शकत नाहीत, असे सांगताना भूषण यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारने लादलेली आणीबाणी आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात झालेल्या दंगली ही दोन उदाहरणे दिली. यादव यांनी पक्षाला मिळालेल्या दोन कोटींच्या देणग्या आणि दिल्ली निवडणुकीच्या काळात एका उमेदवाराच्या गोदामात सापडलेल्या दारूच्या साठ्याबाबत अंतर्गत लोकपालांकडून चौकशीची मागणीही केली.आमची तत्त्वाची लढाईआम्ही एखादा प्रश्न उपस्थित केल्यास आमच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. आमची लढाई पक्षाची मूलभूत तत्त्वे कायम ठेवण्यासाठी आहे. पक्षाची घटना आपच्या वेबसाईटवरून काढली आहे.- योगेंद्र यादवकेजरीवालांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आमदारांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. कार्यकारिणीचा यास विरोध असतानाही केजरीवालांनी नायब राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभा विसर्जित न करण्याची विनंती केली होती.- प्रशांत भूषणचर्चा रुळावर असताना अचानक काहीतरी घडले. त्यांनी यापुढे चर्चा सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले. त्यांनी काय घडले ते देशाला सांगायलाच हवे-आशिष खेतान