शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

"तुम्ही माझं घर आणि कुटुंब…’’, राहुल गांधींचं वायनाडच्या जनतेला भावूक पत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 20:44 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली ...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच या दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. दरम्यान, नियमानुसार एका मतदारसंघातून राजीनामा देणं आवश्यक असल्याने राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला एक भावूक पत्र लिहिलं आहे. तसेच तुम्ही माझ्यासाठी घर आणि कुटुंब आहात, असे उदगार राहुल गांधी या पत्रातून काझले आहेत.  

राहुल गांधी या पत्रात लिहिता की, वायनाडमधील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय, त्यासाठी मी तुमचे कसे आभार मानू हे मला कळत नाही आहे. मला सर्वाधिक गरज असताना तुम्ही मला प्रेम आणि संरक्षण दिलं. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. मी तुमच्यासाठी नेहमी उपस्थित राहीन. तुमचे खूप खूप आभार.

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये वायनाडमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तसेच या मतदारसंघाचं पाच वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर २०२४ मध्येही राहुल गांधी यांनी वायनाडसोबतच रायबरेलीतून निवडणूक लढवली. तसेच दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी ह्या येथून पोटनिवडणूक लढवणार आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाड