शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तरुणांचं ब्रेनवॉश करणा-या मदरसा आणि मशिदींवर योगींची नजर

By admin | Updated: April 22, 2017 11:54 IST

बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 22 - दिल्ली आणि उत्तर प्रदेशला टार्गेट करत दहशतवादी कारवायांमध्ये सामील झालेल्या पाच तरुणांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं असलं तरी यामुळे पोलीस सतर्क झाले असून मदरसा आणि मशिदींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मशिदीचा इमाम मोहम्मद फैजान याला अटक करण्यात आली आहे. बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं होतं त्यापैकी अनेकजण मदरशांमध्ये शिकणारे असून त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. बिजनौरचे पोलीस अधिक्षक अजय सहानी यांनी सांगितलं आहे की, "पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा बिजनौर आणि आसपासच्या धार्मिक संस्थांवर नजर ठेवून असणार आहे. या संस्थांमध्ये नेहमी जाणा-या जबाबदार नागरिकांचीही आम्ही मदत मागत आहोत, जेणेकरुन तरुणांना भटकण्यापासून रोखता यावं". अल्पसंख्यांक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 500 मदरसा आहेत ज्यापैकी 15 डिग्री आणि 55 हायस्कूल दर्जाचे आहेत. एकूण 1500 मशिदी असून सर्वांवर पोलिसांची नजर आहे. 
 
 
गुरुवारी सहा राज्यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 19 ते 25 वर्ष वयोगटातील चार तरुणांना अटक केलं होतं, तर आठ तरुणांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या तरुणांचा दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करण्याचा प्लान होता असा आरोप आहे. सहा तरुणांची नोएडा येथे नेऊन चौकशी करुन सोडून देण्यात आलं. त्यांच्या पालकांना इशाराही देण्यात आला. बिजनौरचे पोलीस अधिक्षक अजय सहानी यांनी सांगितलं की, "चौकशी केल्यानंतर या तरुणांना सोडून देण्यात आलं, तर स्थानिक मशिदीतील इमाम मोहम्मद फैजानला अटक करण्यात आली". 
 
पोलिसांना ताब्यात घेतलेल्या तरुणांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. हे सर्वजण वेगवेगळ्या मदरशांमध्ये शिकत होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. त्यांचं आयुष्य आता वाया जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. एटीएस अधिका-यांनी सांगितलं की, "त्यांना दहशतवादी सिद्ध करावं असे कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. हे फक्त भटकलेले तरुण आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यात सुधारणा करत मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांचा व्यवस्था आणि पोलिसांवरील विश्वास वाढेल. त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षणही दिलं जाईल जेणेकरुन सकारात्मक दिशेने त्यांची वाटचाल सुरु होईल".