शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तरुणांचं ब्रेनवॉश करणा-या मदरसा आणि मशिदींवर योगींची नजर

By admin | Updated: April 22, 2017 11:54 IST

बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 22 - दिल्ली आणि उत्तर प्रदेशला टार्गेट करत दहशतवादी कारवायांमध्ये सामील झालेल्या पाच तरुणांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं असलं तरी यामुळे पोलीस सतर्क झाले असून मदरसा आणि मशिदींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मशिदीचा इमाम मोहम्मद फैजान याला अटक करण्यात आली आहे. बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं होतं त्यापैकी अनेकजण मदरशांमध्ये शिकणारे असून त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. बिजनौरचे पोलीस अधिक्षक अजय सहानी यांनी सांगितलं आहे की, "पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा बिजनौर आणि आसपासच्या धार्मिक संस्थांवर नजर ठेवून असणार आहे. या संस्थांमध्ये नेहमी जाणा-या जबाबदार नागरिकांचीही आम्ही मदत मागत आहोत, जेणेकरुन तरुणांना भटकण्यापासून रोखता यावं". अल्पसंख्यांक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 500 मदरसा आहेत ज्यापैकी 15 डिग्री आणि 55 हायस्कूल दर्जाचे आहेत. एकूण 1500 मशिदी असून सर्वांवर पोलिसांची नजर आहे. 
 
 
गुरुवारी सहा राज्यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 19 ते 25 वर्ष वयोगटातील चार तरुणांना अटक केलं होतं, तर आठ तरुणांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या तरुणांचा दिल्ली आणि उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करण्याचा प्लान होता असा आरोप आहे. सहा तरुणांची नोएडा येथे नेऊन चौकशी करुन सोडून देण्यात आलं. त्यांच्या पालकांना इशाराही देण्यात आला. बिजनौरचे पोलीस अधिक्षक अजय सहानी यांनी सांगितलं की, "चौकशी केल्यानंतर या तरुणांना सोडून देण्यात आलं, तर स्थानिक मशिदीतील इमाम मोहम्मद फैजानला अटक करण्यात आली". 
 
पोलिसांना ताब्यात घेतलेल्या तरुणांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं. हे सर्वजण वेगवेगळ्या मदरशांमध्ये शिकत होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. त्यांचं आयुष्य आता वाया जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. एटीएस अधिका-यांनी सांगितलं की, "त्यांना दहशतवादी सिद्ध करावं असे कोणतेही पुरावे हाती लागले नाहीत. हे फक्त भटकलेले तरुण आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यात सुधारणा करत मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांचा व्यवस्था आणि पोलिसांवरील विश्वास वाढेल. त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षणही दिलं जाईल जेणेकरुन सकारात्मक दिशेने त्यांची वाटचाल सुरु होईल".