शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘योगी कार्ड’पुढे काँग्रेसचे डाव फेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:03 IST

राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे.

- सुहास शेलारजयपूर : राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे. मात्र, भाजपाच्या ‘योगी कार्ड’पुढे त्यांचे सर्व डाव फोल ठरत आहे. कारण भाजपाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अशा प्रभागांत प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे जेथे काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे योगी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे.काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत १५ मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे, तर भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवारास निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. राजस्थानात १६ असे मतदारसंघ आहेत, जेथे मुस्लीमांची मते निर्णायक ठरतात. आणि ही मते परंपरागत पद्धतीने काँग्रेसलाच मिळतात. मात्र यंदा बंडखोरी करत या सर्व मतदारसंघातून अपक्ष आणि स्थानिक पक्षाचे मिळून ३८२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या पैकी १२५ उमेदवार मुस्लीम आहेत. त्यामुळे मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्यामुळे येथे हिंदु मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे ओळखून भाजपाने येथे योगी कार्ड पुढे केले आहे.योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रचारातून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने आजवर केवळ मुस्लीमांचेच भले केले, त्यामुळे तो मुस्लीमांचाच पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याशिवाय रामभक्तांनी भाजपाला, तर रावणभक्तांनी काँग्रेसला मतदान करा, असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले. योगींच्या प्रचार सभांना हिंदूंचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच योगींनी आत्तापर्यंत ज्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत, तेथील भाजपाच्या उमेदवाराला हिंदू मतदारांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम बहुल मतदारसंघात योगींच्या सभा घेण्याची मागणी उमेदवारांकडून वाढली आहे. राजस्थानात पंतप्रधान मोदी यांच्यानंतर योगी यांचा चेहरा प्रभावी ठरला आहे. योगींनी आत्तापर्यंत आमेर, अजमेर, उदयपूर या मुस्लीम बहुल जिल्ह्यांत जोरदार प्रचार केला आहे.राजस्थानात बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, शिवाय वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला जनता आणि स्वपक्षातील मंडळी कंटाळली आहे. अशा परिस्थितीत जरी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांना हिंदुंचा प्रतिसाद मिळत असला, तरी त्या प्रतिसादाचे मतांमध्ये परिवर्तन होईल का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे.जाहीरनाम्यालाही धार्मिक रंगहिंदू मतदारांना प्रभावीत करण्यास भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून अनेक धार्मिक मुद्दे हाताळले आहेत. गायींची तस्करी रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याचे आश्वासन, गो-रक्षा पथके वाढविणे, तसेच ‘गारेख’ नावावर बंदी आणणे, बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांना शोधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यातून दिले आहे.ओवेसींच्या सभेस नकारराजस्थानातील काही मुस्लीम संघटनांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी येथे प्रचारसभा घेण्यासाठी साफ नकार दिला. ते सध्या तेलंगणात स्वत:च्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत.>वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेतयोगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात आत्तापर्यंत केलेल्या प्रचारातून केवळ धार्मिक मुद्देच हाताळले आहेत. काँग्रेस कसा मुस्लीमांचा पक्ष आहे, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करताना ते दिसतात. ‘काँग्रेस रखे अली, हमें चाहिये बजरंग बली’, ‘रामभक्त भाजपाको और रावणभक्त काँग्रेस को वोट दो’, ‘बजरंगबली दलित, आदिवासी, गिरवारी, वनवासी और वंचित थे’, ‘राहुल गांधी के परदादा कहते थे मै एक्सिडेंटली हिंदू हुँ’, ‘काँग्रेस कहती थी संसाधनोंपर पहला हक मुस्लीमोंका’ अशा काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगी नेहमी चर्चेत राहिले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ