शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘योगी कार्ड’पुढे काँग्रेसचे डाव फेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:03 IST

राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे.

- सुहास शेलारजयपूर : राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे. मात्र, भाजपाच्या ‘योगी कार्ड’पुढे त्यांचे सर्व डाव फोल ठरत आहे. कारण भाजपाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अशा प्रभागांत प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे जेथे काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे योगी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे.काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत १५ मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे, तर भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवारास निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. राजस्थानात १६ असे मतदारसंघ आहेत, जेथे मुस्लीमांची मते निर्णायक ठरतात. आणि ही मते परंपरागत पद्धतीने काँग्रेसलाच मिळतात. मात्र यंदा बंडखोरी करत या सर्व मतदारसंघातून अपक्ष आणि स्थानिक पक्षाचे मिळून ३८२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या पैकी १२५ उमेदवार मुस्लीम आहेत. त्यामुळे मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्यामुळे येथे हिंदु मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे ओळखून भाजपाने येथे योगी कार्ड पुढे केले आहे.योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रचारातून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने आजवर केवळ मुस्लीमांचेच भले केले, त्यामुळे तो मुस्लीमांचाच पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याशिवाय रामभक्तांनी भाजपाला, तर रावणभक्तांनी काँग्रेसला मतदान करा, असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले. योगींच्या प्रचार सभांना हिंदूंचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच योगींनी आत्तापर्यंत ज्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत, तेथील भाजपाच्या उमेदवाराला हिंदू मतदारांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम बहुल मतदारसंघात योगींच्या सभा घेण्याची मागणी उमेदवारांकडून वाढली आहे. राजस्थानात पंतप्रधान मोदी यांच्यानंतर योगी यांचा चेहरा प्रभावी ठरला आहे. योगींनी आत्तापर्यंत आमेर, अजमेर, उदयपूर या मुस्लीम बहुल जिल्ह्यांत जोरदार प्रचार केला आहे.राजस्थानात बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, शिवाय वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला जनता आणि स्वपक्षातील मंडळी कंटाळली आहे. अशा परिस्थितीत जरी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांना हिंदुंचा प्रतिसाद मिळत असला, तरी त्या प्रतिसादाचे मतांमध्ये परिवर्तन होईल का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे.जाहीरनाम्यालाही धार्मिक रंगहिंदू मतदारांना प्रभावीत करण्यास भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून अनेक धार्मिक मुद्दे हाताळले आहेत. गायींची तस्करी रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याचे आश्वासन, गो-रक्षा पथके वाढविणे, तसेच ‘गारेख’ नावावर बंदी आणणे, बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांना शोधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यातून दिले आहे.ओवेसींच्या सभेस नकारराजस्थानातील काही मुस्लीम संघटनांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी येथे प्रचारसभा घेण्यासाठी साफ नकार दिला. ते सध्या तेलंगणात स्वत:च्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत.>वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेतयोगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात आत्तापर्यंत केलेल्या प्रचारातून केवळ धार्मिक मुद्देच हाताळले आहेत. काँग्रेस कसा मुस्लीमांचा पक्ष आहे, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करताना ते दिसतात. ‘काँग्रेस रखे अली, हमें चाहिये बजरंग बली’, ‘रामभक्त भाजपाको और रावणभक्त काँग्रेस को वोट दो’, ‘बजरंगबली दलित, आदिवासी, गिरवारी, वनवासी और वंचित थे’, ‘राहुल गांधी के परदादा कहते थे मै एक्सिडेंटली हिंदू हुँ’, ‘काँग्रेस कहती थी संसाधनोंपर पहला हक मुस्लीमोंका’ अशा काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगी नेहमी चर्चेत राहिले आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ