शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

“१९८९ मध्ये अयोध्येतून निवडणूक प्रचार कोणी सुरु केला?”; योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:33 IST

Yogi Adityanath News: अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. जनता आमच्यासोबत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

Yogi Adityanath News: २२ तारखेला राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठा, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून राजकारणही अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप धार्मिक राजकारण करत असून, आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा वापर करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. 

काँग्रेसने हिंदू जनतेला मूर्ख बनवलं आणि मुस्लिम मतपेटीचाही मोह त्यांना सोडवत नव्हता. त्यांच्याकडे देशाची सत्ता दीर्घकाळ होती त्यांनी मंदिर उभारण्यासाठी काही हालचाली का केल्या नाहीत, अशी विचारणा करत, १९८९ मध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ अयोध्येतून फोडला होता. मतपेटीचे राजकारण रामाचे नाव घेऊनच केले. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. 

आम्ही राजकारण केले नाही, जनता आमच्या बरोबर आहे

आम्हाला राम मंदिर उभारले जावे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागली. स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. आता राम मंदिर उभे राहत आहे. आम्ही राजकारण केले नाही. देशाच्या आस्थेनुसार आम्ही वागलो. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते. त्यानंतर अनेक शुभ मुहूर्त असतात. त्यानुसारच रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.  एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.

दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे.  देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणं मांडलं आहे. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आग्रहाचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथ