शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

“१९८९ मध्ये अयोध्येतून निवडणूक प्रचार कोणी सुरु केला?”; योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:33 IST

Yogi Adityanath News: अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. जनता आमच्यासोबत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

Yogi Adityanath News: २२ तारखेला राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठा, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून राजकारणही अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप धार्मिक राजकारण करत असून, आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा वापर करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. 

काँग्रेसने हिंदू जनतेला मूर्ख बनवलं आणि मुस्लिम मतपेटीचाही मोह त्यांना सोडवत नव्हता. त्यांच्याकडे देशाची सत्ता दीर्घकाळ होती त्यांनी मंदिर उभारण्यासाठी काही हालचाली का केल्या नाहीत, अशी विचारणा करत, १९८९ मध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ अयोध्येतून फोडला होता. मतपेटीचे राजकारण रामाचे नाव घेऊनच केले. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. 

आम्ही राजकारण केले नाही, जनता आमच्या बरोबर आहे

आम्हाला राम मंदिर उभारले जावे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागली. स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. आता राम मंदिर उभे राहत आहे. आम्ही राजकारण केले नाही. देशाच्या आस्थेनुसार आम्ही वागलो. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते. त्यानंतर अनेक शुभ मुहूर्त असतात. त्यानुसारच रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.  एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.

दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे.  देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणं मांडलं आहे. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आग्रहाचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथ