शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

“१९८९ मध्ये अयोध्येतून निवडणूक प्रचार कोणी सुरु केला?”; योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 09:33 IST

Yogi Adityanath News: अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. जनता आमच्यासोबत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

Yogi Adityanath News: २२ तारखेला राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यासाठी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठा, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून राजकारणही अधिकच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप धार्मिक राजकारण करत असून, आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा वापर करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. 

काँग्रेसने हिंदू जनतेला मूर्ख बनवलं आणि मुस्लिम मतपेटीचाही मोह त्यांना सोडवत नव्हता. त्यांच्याकडे देशाची सत्ता दीर्घकाळ होती त्यांनी मंदिर उभारण्यासाठी काही हालचाली का केल्या नाहीत, अशी विचारणा करत, १९८९ मध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ अयोध्येतून फोडला होता. मतपेटीचे राजकारण रामाचे नाव घेऊनच केले. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. 

आम्ही राजकारण केले नाही, जनता आमच्या बरोबर आहे

आम्हाला राम मंदिर उभारले जावे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागली. स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला. आता राम मंदिर उभे राहत आहे. आम्ही राजकारण केले नाही. देशाच्या आस्थेनुसार आम्ही वागलो. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच अयोध्येत सर्व काही शास्त्रांनुसार होत आहे. मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते. त्यानंतर अनेक शुभ मुहूर्त असतात. त्यानुसारच रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.  एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते.

दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे.  देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणं मांडलं आहे. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आग्रहाचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथ