शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:09 IST

अखिलेश यादव सरकारमध्ये नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापासून पुरस्कार वितरणापर्यंत जातीवादाचा आरोप केला जात होता. परंतु, आता राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार देखील त्याच मार्गावर निघाले आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने याआधी समाजवादी पक्षाचा 'यादववाद' आणि मायावतींच्या 'जाटववाद'च्या विरोधात अनेकदा रस्त्यावरून उतरून विधानसभेपर्यंत विरोध केला आहे. अखिलेश यादव सरकारमध्ये नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापासून पुरस्कार वितरणापर्यंत जातीवादाचा आरोप केला जात होता. परंतु, आता राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार देखील त्याच मार्गावर निघाले आहे. लखनौमधील ६० टक्क्यांहून अधिक पोलिस ठाण्यांची जबाबदारी ब्राह्मण किंवा क्षत्रिय समाजातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

राज्यातील चर्चित आयजी अमिताभ ठाकूर यांची पत्नी डॉ. नुतन ठाकूर यांनी माहितीच्या आधिकाराखाली लखनौमधील पोलिस ठाणाप्रमुखांची यादी मागवली होती. त्यानुसार लखनौच्या एसएसपी कलानिधी नैथानी यांनी २५ जून रोजी ठाणेप्रमुखांची यादी दिली. यादीनुसार राजधानीतील सर्वाधिक ठाण्यात क्षत्रिय किंवा ब्राह्मण ठाणे प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.

लखनौमध्ये ४३ पोलिस ठाणे आहेत. यापैकी १४ ठाण्यात क्षत्रिय, ११ मध्ये ब्राह्मण, ९ ठिकाणी मागास, ८ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठाण्यात मुस्लीम ठाणेप्रमुख नियुक्त करण्यात आले. अशा प्रकारे लखनौमधील एकूण ठाणाप्रमुखांमध्ये ६० टक्के ब्राह्मण किंवा ठाकूर नियुक्त आहेत. यात केवळ क्षत्रिय जातीचे एक तृतीयांश ठाणाप्रमुख आहेत. विशेष म्हणजे लखनौच्या एकाही ठाण्याच्या प्रमुखपदी यादव समूहातील कुणालाही नियुक्त करण्यात आलेले नाही. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या नुतन ठाकूर यांनी केला आहे.