शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

योगाने संपूर्ण जगाला भारताबरोबर जोडले - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: June 21, 2017 09:45 IST

भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे.

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 21 - आज योगा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे. मागच्या तीनवर्षात अनेक नव्या योगा संस्था आकाराला आल्याचा आनंद आहे. योग शिक्षकांची मागणी वाढत चालली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासनांचे महत्व विषद केले. ते तिस-या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने लखनऊमध्ये बोलत होते. 
 
पंतप्रधान मोदी यंदा लखनऊमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदीं स्वत: योगासने करत आहेत. फक्त शारीरीक तंदुरुस्ती नव्हे निरोगी शरीस्वास्थय महत्वाचे आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासने करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. जेवणामध्ये जसे मीठ लागते तसेच योगाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवा असे आवाहन मोदींनी केले. 
 
 
देशभरात योग दिवस साजरा करणा-या सर्वांना मोदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतरही मोठया संख्येने उपस्थित राहून योगदिन साजरा करण्याचा उत्साह दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांचे आभार मानले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईकही योग दिनाला उपस्थित आहेत. योगा शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र आणते. आज भाषिक आणि सांस्कृतिक रेषा ओलांडून संपूर्ण जग योगामुळे एकत्र येत आहे. आज जगातील अनेक देशांना आपली भाषा, परंपरा, संस्कृती माहित नाही पण ते सर्व देश योगाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत असे मोदी म्हणाले. आधी योगासने हिमालयातील साधूपर्यंत मर्यादीत होती पण आता ती सर्व सामान्यांच्या आयुष्याचा भाग बनली आहेत असे मोदी म्हणाले. 24 तास योगासने करण्याची आवश्यकता नाही. 50 ते 60 मिनिटे योगासने केली तरी, भरपूर आहे. 125 कोटी भारतीय आणि जगभरातील लोकांनी नियमित योगासने सुरु केली तर, मानवी विचारातून ज्या समस्या उदभवतात त्यावर मात करता येईल असे मोदी म्हणाले. मीठाचे उदहारण देऊन मोदींनी योगाचे महत्व विषद केले. मीठ जेवणात फक्त चवीसाठी नाही तर शरीर स्वास्थासाठी आवश्यक असते तसेच मीठा इतकेच योगा आयुष्यात महत्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.  
 
 
लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. आंबेडकर मैदानावरील या योग कार्यक्रमामध्ये 50 हजार नागरीक सहभागी झाले आहेत. योगाच्या माध्यमातून भारत नवी उंची गाठू शकतो असे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.