शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

योगाने संपूर्ण जगाला भारताबरोबर जोडले - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: June 21, 2017 09:45 IST

भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे.

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 21 - आज योगा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे. मागच्या तीनवर्षात अनेक नव्या योगा संस्था आकाराला आल्याचा आनंद आहे. योग शिक्षकांची मागणी वाढत चालली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासनांचे महत्व विषद केले. ते तिस-या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने लखनऊमध्ये बोलत होते. 
 
पंतप्रधान मोदी यंदा लखनऊमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदीं स्वत: योगासने करत आहेत. फक्त शारीरीक तंदुरुस्ती नव्हे निरोगी शरीस्वास्थय महत्वाचे आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासने करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. जेवणामध्ये जसे मीठ लागते तसेच योगाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवा असे आवाहन मोदींनी केले. 
 
 
देशभरात योग दिवस साजरा करणा-या सर्वांना मोदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. मुसळधार पाऊस कोसळल्यानंतरही मोठया संख्येने उपस्थित राहून योगदिन साजरा करण्याचा उत्साह दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी उपस्थितांचे आभार मानले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईकही योग दिनाला उपस्थित आहेत. योगा शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र आणते. आज भाषिक आणि सांस्कृतिक रेषा ओलांडून संपूर्ण जग योगामुळे एकत्र येत आहे. आज जगातील अनेक देशांना आपली भाषा, परंपरा, संस्कृती माहित नाही पण ते सर्व देश योगाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत असे मोदी म्हणाले. आधी योगासने हिमालयातील साधूपर्यंत मर्यादीत होती पण आता ती सर्व सामान्यांच्या आयुष्याचा भाग बनली आहेत असे मोदी म्हणाले. 24 तास योगासने करण्याची आवश्यकता नाही. 50 ते 60 मिनिटे योगासने केली तरी, भरपूर आहे. 125 कोटी भारतीय आणि जगभरातील लोकांनी नियमित योगासने सुरु केली तर, मानवी विचारातून ज्या समस्या उदभवतात त्यावर मात करता येईल असे मोदी म्हणाले. मीठाचे उदहारण देऊन मोदींनी योगाचे महत्व विषद केले. मीठ जेवणात फक्त चवीसाठी नाही तर शरीर स्वास्थासाठी आवश्यक असते तसेच मीठा इतकेच योगा आयुष्यात महत्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.  
 
 
लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. आंबेडकर मैदानावरील या योग कार्यक्रमामध्ये 50 हजार नागरीक सहभागी झाले आहेत. योगाच्या माध्यमातून भारत नवी उंची गाठू शकतो असे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.