शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारवर डोळा ठेवूनच धार्मिक जनगणनेची आकडेवारी येचुरींचा दावा : मोदी सरकारलाही धोरण लकव्याने ग्रासले

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

हैदराबाद : रालोआ सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धार्मिक आकडेवारी जारी करण्याचा नेम साधल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.

हैदराबाद : रालोआ सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धार्मिक आकडेवारी जारी करण्याचा नेम साधल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.
यापूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारवर धोरण लकव्याचा आरोप केला जात होता. मोदी सरकारचेही आता तसेच झाले आहे. भाजपच्या नेतृत्वातील सरकार जातीय ध्रुवीकरण वाढविणारी धोरणे अवलंबत असून बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धर्मावर आधारित आकडेवारी जारी करण्यात आली आहे. त्यामागे चालबाजी दिसून येते. डाटा तयार असताना तो जारी करू नये असे जनगणना कार्यालयाला यापूर्वी कधी सांगण्यात आल्याचे स्मरत नाही, यावेळी ते घडले, कारण बिहारमधील विधानसभेची निवडणूक येत आहे, असे ते म्हणाले. सरकारने कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या आयात-निर्यात धोरणाचे काय? आर्थिक धोरणाबाबत कोणतेही नियोजन दिसत नाही. थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात, असेही येचुरी यांनी स्पष्ट केले. मोदींनी २४ देशांना भेटी देत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप तरी काही दिसत नाही. जगभरात आर्थिक मंदी आली आहे. निर्देशांकात चढ-उतार होत आहे. या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? मनमोहनसिंग सरकारच्या काळात दिसून येणाऱ्या धोरण लकव्याने मोदी सरकारला वर्षभरातच ग्रासले आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
-----------------------------
चार वर्षांनंतर आकडेवारी
केंद्रीय गृहमंत्रालयाने आकडेवारी तुकड्यांमध्ये जारी करताना त्याचे विश्लेषण देण्याचे टाळले आहे. अहवाल चार वर्षांपूर्वीच तयार झाला असताना सरकारने गेल्या मंगळवारी धर्मनिहाय डाटा जारी केला. अद्याप जातनिहाय आकडेवारी जारी केलेली नाही. सरकारने जातनिहाय आकडेवारीऐवजी धर्मावर आधारित माहिती देण्यामागे धार्मिक धु्रवीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप जेडीयूने बुधवारी केला होता.