शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

बिहारवर डोळा ठेवूनच धार्मिक जनगणनेची आकडेवारी येचुरींचा दावा : मोदी सरकारलाही धोरण लकव्याने ग्रासले

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

हैदराबाद : रालोआ सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धार्मिक आकडेवारी जारी करण्याचा नेम साधल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.

हैदराबाद : रालोआ सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धार्मिक आकडेवारी जारी करण्याचा नेम साधल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.
यापूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारवर धोरण लकव्याचा आरोप केला जात होता. मोदी सरकारचेही आता तसेच झाले आहे. भाजपच्या नेतृत्वातील सरकार जातीय ध्रुवीकरण वाढविणारी धोरणे अवलंबत असून बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धर्मावर आधारित आकडेवारी जारी करण्यात आली आहे. त्यामागे चालबाजी दिसून येते. डाटा तयार असताना तो जारी करू नये असे जनगणना कार्यालयाला यापूर्वी कधी सांगण्यात आल्याचे स्मरत नाही, यावेळी ते घडले, कारण बिहारमधील विधानसभेची निवडणूक येत आहे, असे ते म्हणाले. सरकारने कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या आयात-निर्यात धोरणाचे काय? आर्थिक धोरणाबाबत कोणतेही नियोजन दिसत नाही. थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात, असेही येचुरी यांनी स्पष्ट केले. मोदींनी २४ देशांना भेटी देत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप तरी काही दिसत नाही. जगभरात आर्थिक मंदी आली आहे. निर्देशांकात चढ-उतार होत आहे. या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? मनमोहनसिंग सरकारच्या काळात दिसून येणाऱ्या धोरण लकव्याने मोदी सरकारला वर्षभरातच ग्रासले आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
-----------------------------
चार वर्षांनंतर आकडेवारी
केंद्रीय गृहमंत्रालयाने आकडेवारी तुकड्यांमध्ये जारी करताना त्याचे विश्लेषण देण्याचे टाळले आहे. अहवाल चार वर्षांपूर्वीच तयार झाला असताना सरकारने गेल्या मंगळवारी धर्मनिहाय डाटा जारी केला. अद्याप जातनिहाय आकडेवारी जारी केलेली नाही. सरकारने जातनिहाय आकडेवारीऐवजी धर्मावर आधारित माहिती देण्यामागे धार्मिक धु्रवीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप जेडीयूने बुधवारी केला होता.