शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

बिहारवर डोळा ठेवूनच धार्मिक जनगणनेची आकडेवारी येचुरींचा दावा : मोदी सरकारलाही धोरण लकव्याने ग्रासले

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

हैदराबाद : रालोआ सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धार्मिक आकडेवारी जारी करण्याचा नेम साधल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.

हैदराबाद : रालोआ सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धार्मिक आकडेवारी जारी करण्याचा नेम साधल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे.
यापूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारवर धोरण लकव्याचा आरोप केला जात होता. मोदी सरकारचेही आता तसेच झाले आहे. भाजपच्या नेतृत्वातील सरकार जातीय ध्रुवीकरण वाढविणारी धोरणे अवलंबत असून बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळविण्याच्या उद्देशानेच जनगणनेची धर्मावर आधारित आकडेवारी जारी करण्यात आली आहे. त्यामागे चालबाजी दिसून येते. डाटा तयार असताना तो जारी करू नये असे जनगणना कार्यालयाला यापूर्वी कधी सांगण्यात आल्याचे स्मरत नाही, यावेळी ते घडले, कारण बिहारमधील विधानसभेची निवडणूक येत आहे, असे ते म्हणाले. सरकारने कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. अन्न-धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या आयात-निर्यात धोरणाचे काय? आर्थिक धोरणाबाबत कोणतेही नियोजन दिसत नाही. थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात, असेही येचुरी यांनी स्पष्ट केले. मोदींनी २४ देशांना भेटी देत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप तरी काही दिसत नाही. जगभरात आर्थिक मंदी आली आहे. निर्देशांकात चढ-उतार होत आहे. या परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? मनमोहनसिंग सरकारच्या काळात दिसून येणाऱ्या धोरण लकव्याने मोदी सरकारला वर्षभरातच ग्रासले आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
-----------------------------
चार वर्षांनंतर आकडेवारी
केंद्रीय गृहमंत्रालयाने आकडेवारी तुकड्यांमध्ये जारी करताना त्याचे विश्लेषण देण्याचे टाळले आहे. अहवाल चार वर्षांपूर्वीच तयार झाला असताना सरकारने गेल्या मंगळवारी धर्मनिहाय डाटा जारी केला. अद्याप जातनिहाय आकडेवारी जारी केलेली नाही. सरकारने जातनिहाय आकडेवारीऐवजी धर्मावर आधारित माहिती देण्यामागे धार्मिक धु्रवीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप जेडीयूने बुधवारी केला होता.