शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्ष वाया गेले; ‘त्यांना’ शिक्षा करा!

By admin | Updated: January 11, 2015 01:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले़ तुमचे एक वर्ष वाया घालविणाऱ्यांना शिक्षा द्या, असे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले़

मोदींची केजरीवालांवर टीका : दिल्लीत प्रचाराचे रणशिंग फुंकले अराजकवादी नेत्यांनी नक्षल्यांना सामील व्हावेनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले़ तुमचे एक वर्ष वाया घालविणाऱ्यांना शिक्षा द्या, असे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले़ त्यांचा रोख आम आदमी पार्टीकडे होता़दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोदींची जाहीर सभा झाली़ या वेळी मोदींनी राजधानीत ४९ दिवसांचे सरकार चालविणारे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता, त्यांना जोरदार लक्ष्य केले़ स्वत:ला अराजकतावादी म्हणणारा नेता तुम्ही कधी पाहिला आहे का? अराजकता माजविणाऱ्यांनी जंगलात जाऊन नक्षल्यांमध्ये सामील व्हावे़ दिल्लीत नक्षलवाद चालू दिला जाणार नाही, असे मोदी या वेळी म्हणाले़आम आदमी पार्टीकडून निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्यासारखी अनेक खोटी आश्वासने दिली जात आहेत. दिल्लीत ‘असत्याचा कारखाना’ जोरात सुरू आहे़ मोदी कुणी पाठीत खंजीर खुपसणारी व्यक्ती नाही़ ते खोटे बोलण्यात तरबेज आहेत़ म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे मोदी या वेळी म्हणाले़केजरीवाल यांच्यावरही मोदींनी अप्रत्यक्ष हल्ला केला़ काम येते, त्यांना काम द्या आणि जे फुटपाथवर झोपण्यात, धरणे देण्यात निष्णात आहेत, त्यांना तेच करू द्या़ आम्ही चांगले सरकार देण्यात निष्णात आहोत, तेव्हा आम्हाला ती संधी द्या़ भाजपा केवळ स्थिर आणि सक्षम सरकार देईल़ हे सरकार दिल्लीकरांच्या वाया गेलेल्या एका वर्षाची भरपाई करेल़ एवढेच नव्हे, तर गत १५ वर्षांत (काँगे्रस शासनकाळ) अधुरी राहिलेली दिल्लीकरांची स्वप्नेही पूर्ण करेल, अशी ग्वाही या वेळी मोदींनी दिली़ २४ तास वीज देण्याचे, २०२२ पर्यंत दिल्लीतील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला पक्के घर देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्लीकरांना दिले़बँका श्रीमंतांच्या ताब्यात आहेत व गरिबांना त्यांचा लाभ होत नसल्याचा कांगावा करीत सुमारे ४० वर्षांपूर्वी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयीकरण केले़ पण दुर्दैवाने यामुळे गरिबांचा कुठलाही फायदा झाला नाही़ सरकारच्या कब्जात आलेल्या बँका केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या़ आमच्या सरकारने जनधन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सने गरिबांची बँकेत खाती उघडली़ आधी एक वर्षात एक कोटी खाती उघडली़ - नरेंद्र मोदी, पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचा ‘रामलीला’वर सत्कारच्भाजपाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलिला मैदानावर फुंकण्यात आला. च्त्यावेळी रामलीला मैदानावर झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र), मनोहरलाल खट्टर (हरियाणा)व रघुवर दास (झारखंड)या भाजपाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा सत्कार दिल्ली प्रदेश भाजपाच्यावतीने करण्यात आला. च् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘छत्रपतींचा आशीर्वाद करू नरेंद्र मोदींचा साथ,‘ या घोषणेने महाराष्ट्रात पक्ष सत्तेत आला. जे महाराष्ट्रात झाले तेच दिल्लीत झाले पाहिजे़मोदींनी केवळ आश्वासने दिली -काँग्रेसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले असतानाच काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली़ नरेंद्र मोदी यांनी केवळ आश्वासने दिली, याउलट काँग्रेसने दिल्लीतील आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास केला, असे काँग्रेसने शनिवारी म्हटले़काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी टिष्ट्वटरवरून मोदींना लक्ष्य केले़ पंतप्रधान मोठे वक्ते आहेत, पण त्यांनी केवळ आश्वासने दिलीत़ काँग्रेसच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात दिल्लीत सर्वाधिक विकास झाला, हे आमचे विरोधकही नाकारू शकत नाही़त मेट्रो, उड्डाणपूल आणि अन्य पायाभूत विकास काँग्रेस कार्याची पावती आहे अशा आशयाचे टिष्ट्वट त्यांनी केले़मोदींनी आपल्या भाषणात जनधन योजनेचा उल्लेख केला़ तोच धागा पकडून सिंघवी यांनी दुसरे टिष्ट्वट केले़ रालोआ सरकारद्वारा उघडलेली ७५ टक्के खाती खाली आहेत, असे ते म्हणाले़ दिल्लीतील काँगे्रसच्या उपलब्धींच्या तुलनेत ‘आप’ एक फसलेला प्रयोग होता, असे सांगत सिंघवी यांनी आम आदमी पार्टीलाही लक्ष्य केले़